HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबई | अखेर राज्य सरकारने महाराष्ट्रातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून ११२ तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून सातत्याने वारंवार जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती. त्याचप्रमाणे राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे ? असा प्रश्नही वारंवार उपस्थित केला जात होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याची घोषणा केली होती. ऑक्टोबर अखेरपर्यंत ही राज्यातील दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा केली जाईल, असे फडणवीस सरकारकडून सांगण्यात आले होते. या घोषणेनंतर आता केंद्र सरकारचे पथक लवकरच दुष्काळसदृश भागांची पाहणी करणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते.

“सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात १९७२ या वर्षीपेक्षाही भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे आता निकषांची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करायला हवा,” अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली होती.

“सरकारला ३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करायला कोणता मुहुर्त मिळणार आहे.भाजपला सरकारी तिजोरीतले पैसे वाचवायचे आहेत म्हणून दुष्काळ जाहीर करण्यात उशीर केला जात आहे,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी सरकारवर केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानभवनाच्या परिसरात नितेश राणे-अबू आझमी ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरुन आमने-सामने

Aprna

लॉकडाऊनवरुन राज्य सरकारमध्ये थोडेसे मतभेद असले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत

News Desk

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

Manasi Devkar