HW News Marathi
महाराष्ट्र

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची बार्टीच्या विद्यार्थ्यांप्रति दिसली उदासीनता! – प्रीतम मुंडे

बीड | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर परळी तहसील कार्यालयाच्या समोर गेल्या 4 दिवसापासून 194 विद्यार्त्यांचे साखळी उपोषण बार्टीच्या माध्यमातून देण्यात येणारी फेलोशिप एम फिलच्या 2 वर्षासह पीएचडीच्या 3 वर्षासाठी देखील देण्यात यावी. ही प्रमुख मागणी घेऊन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीतील कार्यालया बाहेर राज्यातील अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांनी, बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. यावेळी ‘धनंजय मुंडे होश मे आओ’ अशी घोषणबाजी देखील करण्यात येत आहे. उपोषणाच्या 3 च्या दिवशी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपोषण कर्त्याची भेट घेतली. मात्र, त्यांनी ही विद्यार्थ्यांना कसलेच आश्वासन दिले, नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. धनंजय मुंडेंनी उपोषणाला बसलेल्या वागणुकीमुळे खासदार डॉ. प्रतीम मुंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकारच्या नियमाप्रमाणे एम.फिल. करणाऱ्या, संशोधक विद्यार्थ्यांना सलग 5 वर्षे PHD पर्यंत फेलोशिप देण्यात येते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणेच्या माध्यमातुन देण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती मात्र एम.फिल. या अभ्यासक्रमासाठी 2 चं वर्षे दिली जात आहेत. शिवाय PHD साठी सलग अधिछात्रवृत्ती देण्यापासून विद्यार्थी वंचित रहात आहेत. याविषयी अनेक वेळा मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देवूनही त्यांनी दखल न घेतल्याने आम्ही याठिकाणी बेमुदत उपोषणाला बसलो असल्याचं उपोषणकरत्यांनी सांगितलं. तसंच जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत उठणार नाहीत. तर यापुढे आमरण उपोषण देवल असा इशारा उपोषणकर्त्या विद्यार्थी मुलीने दिला आहे.

मंत्री प्रश्न सोडवित नसेल तर प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लावू – प्रीतम मुंडे

जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी साखळी उपोषणाच्या 4 दिवस सुरू असून परळी येथे सुरू असलेल्या बर्टी च्या विद्यार्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी काल सामाजिक नय्य व विशेष सहाय्य मंत्री अर्थात या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी उपोषण कर्त्यांची धावती भेट घेत मुलांना एका प्रकारची तंबी दिली व निघून गेल्याचे उपोषण करते म्हणले व निघून गेले. मात्र, ज्या मागणीसाठी विद्यार्थी उपोषण करत आहेत तेच मागणी पूर्ण होत नसेल तर आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे बर्टीचे विद्यार्थी म्हणाले. तर यावर डॉ प्रीतम मुंडेंनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणल्या की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा मंत्री धनंजय मुंडे यांचा असून ते या खात्याचे मंत्री आहेत. आणि जर हा प्रश्न धनंजय मुंडे सोडवू शकत नसतील तर आम्ही हा प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लावू. मात्र, मुंडेंनी आपल्या खात्याची प्रश्न सोडवण्या ऐवजी बीड रेल्वेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ नये, असा खोचक टोला लगावला असून त्यांना साधावेळ पण देऊ शकत नसू तर यापेक्षा आणखी दुर्दैव आणखी काय असणार, अशी बोचरी टीका देखील प्रीतम मुंडे यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत!

News Desk

लोकप्रतिनिधींना मतदारसंघात धरण नाही झाले तरी चालेल, पण मेडिकल कॉलेज पाहिजे – अमित देशमुख

News Desk

‘अमरावतीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू!’

News Desk