HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकरी आंदोलनादरम्यान पोलिसांनी सत्त्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांना घेतले ताब्यात

कराड | मोदी सरकारच्या ३ कृषी कायद्यांच्या विरोधात देशभर आज (६ फेब्रुवारी) शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या आंदोलनाला महाराष्ट्रातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातून सत्त्वशीला चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे. सत्त्वशीला चव्हाण यांनी यावेळी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला बोचरा सवाल केला आहे.

“शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?”, असा थेट सवाल सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सत्त्वशीला चव्हाणही या खरंतर कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे म्हटले जाते. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजच्या शेतकऱ्यांच्या देशव्यापी चक्काजाममध्ये त्यांनीही आपला सहभाग दाखवला आहे.

शेतकऱ्यांचे हे देशव्यापी आंदोलन राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर केले जाणार असून ३ तासांच्या या चक्काजामध्ये कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही कृषी संयुक्त किसान मोर्चाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी देखील या शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनला पाठिंबा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कॉंग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याने सेना-राष्ट्रवादी हलली, दरेकरांचा घणाघात

News Desk

“शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार!

News Desk

ईडीचे अधिकारी भाजपची ATM मशीन! – संजय राऊत

Aprna