HW News Marathi
महाराष्ट्र

भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करू द्यायचा कट पंतप्रधानांनी रचलाय ! | जयंत पाटील

वाशिम | “देशात आज परिस्थिती फार वाईट आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. कामगारांचे कायदे मोडून काढले जात आहेत. भांडवलदारांना शेती व्यवसायात चंचू प्रवेश करून द्यायचा कट पंतप्रधानांनी रचला आहे” असा आरोप करत “मोदींकडे पाहिले तर वाटते राज्यकर्ते असे क्रुर कसे असू शकतात ?” असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज (६ फेब्रुवारी) दहाव्या दिवशी वाशिम जिल्हयात असून यावेळी वाशिम जिल्हयातील रिसोड विधानसभेचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या मतदारसंघात निवडणूक लढवते, ज्या मतदारसंघात लढवत नाही अशा दोन्ही मतदारसंघाला राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त भेट देत असल्याचे सांगताना आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभे करायचे आहे. सत्ता असो किंवा नसो आपल्या कार्यकर्त्यांचा जथा नेहमीच तयार पाहिजे”, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. “शेतकरी आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मोदींनी पेट्रोल – डिझेलचे भाव वाढवले. चहूबाजूंनी जनतेला अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. परकीय लोक देशावर सत्ता गाजवत आहे असा भास होतो आहे”, असेही जयंत पाटील म्हणाले.

यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC च्या सर्व शाळेत भगवत गीतेचे पठण करण्याची भाजपच्या नगसेविकेची महापौरांकडे पत्रद्वारे मागणी

Aprna

जाणून घ्या…राष्ट्रपती राजवट म्हणजे काय ?

News Desk

सूडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्वा नाही! – मुख्यमंत्री

Aprna