HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे, खडसेंनी करुन दिली आठवण

मुंबई | राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी भेट दिली होती आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या सुन आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी फडणवीस आणि खडसे यांच्यात फोनवर बातचीत झाल्याचं सांगितलं होतं. भाजप पक्ष सोडताना गंभीर आरोप केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे यांच्या घऱी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर बोलताना एकनाथ खडसे आमचे पालकच असल्याची प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान एकनाथ खडसे यांनीदेखील फडणवीसांच्या या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते आज ( ७ जून) मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

फडणवीस तेव्हा जेवणही माझ्याचं घरी करायचे

“मी विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस माझ्याकडे १२-१८ तास राहायचे. जेवणही माझ्याकडे करायचे… झोपायचेही. देवेंद्र फडणवीस त्या कालखंडात माझ्या बी-४ बंगल्यावर बऱ्याचदा असायचे,” असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. पुढे ते म्हणाले की, “मुख्यमंत्री म्हणूनही ते माझ्याकडे जळगाववला मुक्ताईनगरला आले होते. माझ्याकडे सूत गिरणीचं, साखर कारखान्याचं उद्घाटन झालं तेव्हा ते येऊन गेले होते”दरम्यान एकनाथ खडसे यांनी या वेळी वारंवार सरकार पडणार असल्याच्या वक्तव्याच्या समाचार घेत भाजपा नेत्यांना टोला लगावला. “आमचं सरकार येणार आहे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे

“आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील,” अशी शंका एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसे आणि फडणवीसांचं बोलणं झालं

१ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. रक्षा खडसे यांनी फडणवीसांच्या भेटीबद्दल बोलताना सांगितलं होतं की, “फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी असून आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपाची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्याकडे आमचं लक्ष आहे, महापालिकेच्या ८० जागा शिवसेना लढवेल – संजय राऊत

News Desk

#CoronaVirus : राज्यात संचारबंदीमध्ये कोणा कोणाला मिळणार पेट्रोल-डिझेल

swarit

सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन आरक्षणासंदर्भात एकदिलाने काम करावे – छत्रपती संभाजीराजे

News Desk