HW News Marathi
महाराष्ट्र

थकीत वीजबिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीत होणार!

मुंबई | कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांना भरमसाठी वीजबिले आली आहेत. याबाबत ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात होती. वीजबिले माफ करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती. दरम्यान, आता तातडीने वीज बिल थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणाने आदेश जारी केले आहेत. जर तुम्ही वीजबिल भरले नाही तर थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे.वीजबिल थकबाकीची वसुली तातडीनं करण्याचे आदेश महावितरणने आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. सोबतच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेशही दिले गेले आहेत.

डिसेंबर २०२० अखेर राज्यात ६३ हजार ७४० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरले नाही, तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यांमध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिली आहे. थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णयही महावितरणने घेतला आहे. महावितरणच्या या वीज बिल वसुली सक्तीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजितदादांकडून शरद पवारांचं कौतुक तर पिचड पितापुत्रावर निशाणा!

News Desk

मात्र आज पवारांनी त्याच्या पुढचा पर्याय नितिन गडकरींना सांगितला!

News Desk

संभाजीराजे, नाक दाबल्याशिवाय ठाकरे सरकारचं तोंड उघडणार नाही! – चंद्रकांत पाटलांचा सल्ला

News Desk