HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना मंत्री-नेत्यांची तातडीची बैठक, उद्धव ठाकरे राठोडांबाबत कठोर निर्णय घेणार ?

मुंबई । राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपलेले असताना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक आक्रमकपणे होऊ लागली आहे. भाजपने याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून याच आज (२७ फेब्रुवारी) संध्याकाळी ६.३० वाजता शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे, आता संजय राठोड राजीनामा देणार की नाही? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनेच्या या बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी ६.३० वाजता वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि काही मोजक्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या सोमवारपासून (१ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर, विरोधकांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. ” संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”, असा इशाराही भजपकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे, काय अंतिम निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजस्थानच्या घडामोडींनंतर महाराष्ट्र सरकारही अलर्ट, शरद पवार, बाळासाहेब थोरात यांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

बुडत्या जहाजाचे ‘कप्तान’ कोण होईल! – चंद्रकांत पाटील

Aprna

मराठा आरक्षणामागे राजकीय षडयंत्र, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

News Desk