HW News Marathi
देश / विदेश

“२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…” भाजपने शरद पवारांना डिवचले

मुंबई । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात झालेली भेट ही राज्यासह देशातही चर्चेचा विषय ठरली. अनेक तर्कवितर्कही लढवले गेले. कारण, येत्या काळात पंतप्रधान मोदींना शह देण्यासाठीची रणनीती आखण्यात हे पहिले पाऊल शरद पवार यांनी टाकल्याचे मानले जाते. दरम्यान, भाजपकडून मात्र या भेटीनंतर अगदी सूचक प्रतिक्रिया येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून शरद पवारांना डिवचले आहे.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या तब्बल साडेतीन तास चाललेल्या बहुचर्चित भेटीवर अतुल भातखळकर यांनी एका वाक्यात आपली प्रतिक्रिया दिली आहे. “२०२४ नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…”, असे खोचक ट्विट अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केले आहे. दरम्यान, अतुल भातखळकर यांच्या या टिकेनंतर आता राष्ट्रवादीकडून काही प्रत्युत्तर येणार का ? हे पाहावे लागेल

फडणवीस काय म्हणाले होते ?

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले होते की, “कुणी कितीही रणनीती आखू द्या, आजही मोदी आहेत आणि 2024 लाही मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता असेल.”

राष्ट्रवादीचे म्हणणे काय ?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, “राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. आपला अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता सुटीच्या दिवशीही मिळणार लस! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

News Desk

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

News Desk

‘मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले’, सचिन सावंतांची संतप्त प्रतिक्रिया

News Desk