HW News Marathi
Covid-19

निमंत्रण मिळाले तरी मी राम मंदिर भूमिपूजनाला जाणार नाही !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, राज्यातील राजकारण चांगलेच पेटले होते. आता पुन्हा एकदा शरद पवारांनी यावर भाष्य केले आहे. “सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा वाद मिटवला आहे. राम मंदिराबाबत आता कोणताही वाद नाही. मात्र, राम मंदिर भूमीपूजनाचे निमंत्रण मिळाले तरी मी जाणार नाही. याचे कारण म्हणजे, सध्या राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. राज्याच्या हिताची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे”, असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. ‘सीएनएन-न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार बोलत होते.

“काहींना वाटतं कि राम मंदिर बांधून कोरोना जाईल. मंदिर बांधून जर कोरोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा”, असे विधान शरद पवारांनी केले होते. पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत शरद पवारांच्या विधानावर फारसे भाष्य करणे टाळले होते. “शरद पवार म्हणाले ते योग्य आहे. कोरोना आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला डॉक्टरांची गरज आहे. आपण ज्या सुविधा निर्माण करतोय केवळ त्याने नव्हे तर डॉक्टर्स-नर्सेसच्या मदतीने रुग्ण कोरोनामुक्त होऊ शकतात”, असे मुख्यमंत्री आपल्या मुलाखतीत म्हणाले. त्यानंतर, या मुलाखतीत पुन्हा एकदा शरद पवारांनी राम मंदिर प्रकरणी भाष्य केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याने हेल्थवर्कर म्हणून घेतली होती लस !

News Desk

कस्तुरबाने कोरोनाबाधितांना कोरोनामुक्त करण्यात गाठली ‘शंभरी’

News Desk

राज्यात ३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम राहणार

News Desk