HW News Marathi
महाराष्ट्र

“पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय”, फडणवीसांचा पवारांवर निशाणा

मुंबई | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. याआधी देखील महाविकास आघाडी सरकारच्या पक्षांमध्ये कुरघोडी सूर होतीच, त्यात आता अजून भर पडली आहे. शरद पवार यांनी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेक राजकारणी यावर आपलं मत देत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

सुबुद्धी सरकारलाही लाभू देत

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मंदिरं न उघडण्याच्या सरकारच्या निर्णयावर देखील निशाणा साधला. “मंदिरं सुरू करण्याची आमची मागणी आहे. आम्ही हिंदू आहोत. आमचे ३३ कोटी देव आहेत. जिथे आम्ही मानू, तिथे आमचे देव आहेत. पण या मंदिरांवर अवलंबून असणारे लाखो लोक आहेत. कुणी फुलं विकतं, कुणी उदबत्ती विकतं, कुणी प्रसाद विकतं, हळद-कुंकू विकतंय. मंदिरांवर अवलंबून असणारे पुजारी, सेवक आहेत. गेल्या दोन वर्षांत या लोकांची विदीर्ण अशी अवस्था झाली आहे. म्हणून आम्ही मागणी केली की मदिरालय सुरू होऊ शकतं, तर मंदिरं का सुरू होऊ शकत नाहीत? सोशल डिस्टन्सिंगचे नियम नक्कीच पाळले जावेत. देशभरात सर्व राज्यांमध्ये मंदिरं सुरू आहेत, फक्त महाराष्ट्रात मंदिरं बंद आहेत. त्यामुळे सगळ्यांना गणरायांनी सुबुद्धी द्यावी, तशी सुबुद्धी सरकारलाही लाभू देत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याबाबत एक उदाहरण पवारांनी सांगितले. उत्तर प्रदेशतील जमिनदारांकडे मोठी शेती आणि हवेलीही असायची. कमाल जमीन धारणा कायदा झाला आणि त्यांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरावर आली. जमीनदार उठतो बाहेर जाऊन बघतो. त्याला पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरव पीक माझे होते, असे सांगतो. पण सध्या ते त्याचे नसते. तशी अवस्था काँग्रेसची झाली आहे, असे निरीक्षण पवारांनी नोंदविले आहे.

शरद पवार यांनी जुनी जमीनदारी संपली असली, तरी उरलेला राजवाडा कसा सांभाळावा हे समजत नाही. काँग्रेसनं आता स्वीकारावं की ते आता जमीनदार राहिलेले नाहीत, असा सल्ला काँग्रेसला दिल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाण्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू

News Desk

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील? राज ठाकरेंनीच दिलं उत्तर, म्हणाले…

News Desk

“पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा नसेल, तर भाजपातले…”, शिवसेनेचा खोचक शब्दांत निशाणा!

News Desk