HW News Marathi
महाराष्ट्र

नाश्त्यावर ताव मारुन काँग्रेसचे उपोषण

नवी दिल्ली | काँग्रेसच्या नेते मंडळींनी उपोषणाला सुरुवात होण्याआधी भरपेट नाश्ता केला. या नेते मंडळींचा नाश्ता करतानाचा फोटो सध्या सोशल मीडीवर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. हा फोटो अत्यंत व्हायरल झाल्यामुळे विरोधांनी काँग्रेसवर टीकेची झोड उटवली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतील राजघाटवर उपोषणाला बसले होते. देशात दलित समाजावर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यानी एकदिवसीय उपोषणा केले. या उपोषणात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह अनेक नेते मंडळी देखील सहभाग दर्शवला.

या उपोषणाची वेळी सकाळी १० वाजताची ठरली होती. पण, राहुल गांधी हे ठरलेल्या वेळेवर आले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते अरविंद सिंह लवली आणि हारुन युसूफ हे छोले भटूरे खातानाचा फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. हा फोटो भाजप नेते हरिश खुराणा यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन फोटो ट्विट करुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जनतेची लूट, विकासकामात तूट, जाहिरातबाजी आणि उधळपट्टीला सूट! अशोक चव्हाण

News Desk

भीमा-कोरेगाव प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेतले, गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

swarit

रेल्वे स्थानक सौंदर्यीकरणात महाराष्ट्र नंबर १

swarit
मुंबई

दोन दिवस धावपट्टी बंद

News Desk

मुंबई | मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी 9 एप्रिल आणि १० एप्रिल रोजी दररोज सहा तास धावपट्टी बंद ठेवण्याचे निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने धावपट्टीची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामुळे सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. यावेळेत येणा-या विमानांच्या वेळेत बदल करून वेळा बदलून त्या दुस-या स्लॉटमध्ये देण्यात आल्या आहेत.

मुंबईत विमानतळाच्या धावपट्टीचे काम करण्यात येत असल्याने 8 व 9 एप्रिल रोजीचे औरंगाबाद येथून दिल्ली येथे जाणारे एअर इंडियाचे विमान रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या विमानांसह औरंगाबाद ते मुंबई तसेच मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांनाही दोन दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील दुस-या क्रमांकाचे अत्यंत वर्दळीचे विमातळ आहे. प्राथमिक धावपट्टी दर तासाला 48 विमाने तर व्दितीय धावपट्टीवर प्रति तास 35 विमानांचे उड्डान होते. सरासरी दररोज या विमानतळामध्ये 9 70 विमानांचे आगमन आणि उड्डान होते. पावसाळ्यानंतर विमान तळाच्या देखभालीसाठी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत धावपट्टी पुन्हा एकदा बंद ठेवण्यात येणार आहे.

Related posts

अंधेरी पूर्व मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान

Aprna

गणेश विसर्जनानंतर गिरगाव चौपाटीची स्वच्छता

Manasi Devkar

जातियवाद्यांना राज’वार’, एका दणक्यात सगळेच गपगार…! राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग

News Desk