HW News Marathi
Covid-19

अखेर केंद्राकडून महाराष्ट्राला हक्काचा GST परतावा मिळाला

मुंबई | राज्यात कोरोनास्थितीमुळे ढासळली अर्थव्यवस्था लक्षात घेतला गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य सरकारकडून वारंवार केंद्र सरकारकडे जीएसटी परतावा मिळावा यासाठी मागणी केली जात होती. या मागणीनुसार, आता अखेर केंद्राकडून राज्याला जीएसटी परतावा मिळाला आहे. केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला आर्थिक वर्ष २०१९-२० मधील जीएसटी परताव्याचे १९ हजार २३३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. देशातील अन्य सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला मिळालेला परतावा सर्वाधिक आहे.

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली होती मागणी

राज्य सरकारकडून वारंवार केंद्राकडे जीएसटी परताव्याची मागणी होत होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे देखील ही महत्त्वाची मागणी केली होती. पंतप्रधान मोदींसोबत ११ मे रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली. “महाराष्ट्राची केंद्राकडे १६ हजार कोटींची थकबाकी आहे. ती जर केंद्राने महाराष्ट्राला आताच्या परिस्थितीत दिली तर या आर्थिक संकटात राज्याला जरासा दिलासा मिळेल”, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणेकरांना लॉकडाऊनमधून एक दिवसाचा दिलासा !

News Desk

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर किती परिणाम होणार?

News Desk

विश्वास नांगरे-पाटील, कृष्णप्रकाश यांच्यासह तब्बल ४५ जणांची बदली…

News Desk