HW News Marathi
महाराष्ट्र

निकालानंतर पहिल्यांदा सोनिया गांधींनी शरद पवारांसोबत फोनवर केली चर्चा

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पाच दिवस उलटून गेले आहेत. यानंतर पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज (२९ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून राज्यातील घडामोडीवर माहिती घेतली. निवडणुकीनंतर पहिल्यांदा सोनिया गांधींनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. सोनिया गांधींनी निवडणुकीत पवारांना अभिनंदन केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या राज्यात शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून संघर्ष सुरू आहे.

शरद पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते दिवाळीचा कार्यक्रम आटपून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राज्यात सत्तास्थापनेची गणिते कशी बदलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. राज्यात कुणाचे सरकार स्थापन होणार आणि कोण मुख्यमंत्री होणार याविषयी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भाजप-शिवसेनामध्ये मुखमंत्री पदावरून कलगीतुरा

पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री पदावर राहणार, असे धक्कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केले आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शिवसनेनेचे खासदार संजय राऊत संताप व्यक्त केला. “मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही,” अशी टीका राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. “मुख्यमंत्री पदाबाबतच्या बोलणीसाठी आज दुपारी 4 वाजता मुंबईत शिवसेनेचे सुभाष देसाई, संजय राऊत तर भाजपच्या भूपेंद्र यादव, प्रकाश जावडेकर यांच्यात चर्चा होणार होती. मात्र, ही बैठक रद्द केल्याची माहिती राऊत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गारपिठीमुळे पिकांप्रमाणे शेतकऱ्यांची घरही कोसळली

News Desk

संजय राऊतांचे नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहील; भाजप आमदाराचा टोला

Aprna

महापरिनिर्वाणदिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन

News Desk