HW News Marathi
महाराष्ट्र

गडचिरोलीत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली | सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. गेल्या ४८ तासात गडचिरोलीच्या सी-६० जवानांनी हे मोठे ऑपरेशन पार पाडले आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांचा कंमाडर नंदू याला ठार मारण्यात पोलिसांना यश आले.अहेरी तालुक्यातील राजाराम खांदलामध्ये असलेल्या कपेवंचा जंगलात ही कारवाई पार पडली.

गडचिरोली पोलिसांनी रविवारी केलेल्या कारवाईत १६ नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आले. भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलच्या परिसरात १६नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ६ नक्षलवाद्यांना ठार केले. ही राज्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राम मंदिराच्या पायभरणीचा सोहळा दिवाळीसारखा साजरा करावा मात्र कोरोनाचे भान ठेवावे – चंद्रकांत पाटील

News Desk

आपल्या हातात सत्ता नाही म्हणून नैराश्येपोटी ते सरकारविरोधात हॅशटॅग ट्रेंड करतात !

News Desk

शाळांमध्ये ‘या’ तारखेला आजी आजोबा दिवस साजरा होणार; दीपक केसरकरांची माहिती

Aprna
राजकारण

मी कधीच पत्रकार परिषदांना घाबरलो नाही !

News Desk

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मी कधीच पत्रकार परिषदांना घाबरलो नाही. मी पत्रकार परिषदांना घाबरणारा पंतप्रधान नव्हतो. मी पंतप्रधान असताना परराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर कायमच पत्रकार परिषद घेत होतो”, असे मनमोहन सिंग यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र दौऱ्यांची प्रचंड चर्चा होताना दिसते. मात्र ते देशात परतल्यानंतर कधीही पत्रकार परिषद घेत नाहीत. याच पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग बोलत होते. “चेंजिंग इंडिया’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये वाढलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. “आरबीआयची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा सन्मान करायला हवा. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचे नाते पती-पत्नीसारखे असते. या दोघांमध्येही मतभेद असतात. परंतु तरीही त्यांना एकत्र राहून समाधान शोधणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे केंद्र आणि रिझर्व्ह बँकेमध्ये देखील योग्य ताळमेळ असणे अत्यंत महत्त्वाचे असते”, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकमध्ये मोठा ताण निर्माण झाला आहे. याचमुळे उर्जित पटेल यांनी आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. परंतु, उर्जित पटेल यांनी मात्र आपण काही वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात आपल्या पदाचा राजीनामा देणारे पहिलेच गव्हर्नर आहेत.

Related posts

राहुल गांधी जम्मू-काश्मीरला रवाना, विमानतळावर रोखण्याची शक्यता

News Desk

प्रकाश शेंडगे वंचित बहुजन आघाडीचे सांगलीतील नवे उमेदवार ?

News Desk

“महाराष्ट्रातल्या किंवा देशातील महिलांचे मन दुखावले असतील तर…”, अब्दुल सत्तारांची टीकेनंतरची प्रतिक्रिया

Aprna