HW News Marathi
महाराष्ट्र

गडचिरोलीत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली | सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या नक्षलविरोधी कारवाईत ६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. गेल्या ४८ तासात गडचिरोलीच्या सी-६० जवानांनी हे मोठे ऑपरेशन पार पाडले आहे. या कारवाईत नक्षलवाद्यांचा कंमाडर नंदू याला ठार मारण्यात पोलिसांना यश आले.अहेरी तालुक्यातील राजाराम खांदलामध्ये असलेल्या कपेवंचा जंगलात ही कारवाई पार पडली.

गडचिरोली पोलिसांनी रविवारी केलेल्या कारवाईत १६ नक्षलवाद्यांना ठार केले. या कारवाईत डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आले. भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलच्या परिसरात १६नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ६ नक्षलवाद्यांना ठार केले. ही राज्यातील आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१० मार्चनंतर सर्व सामान्यांना कोरोना लस उपलब्ध होऊ शकते – छगन भुजबळ

News Desk

मी राजीनामा देतो, साताऱ्यात पुन्हा निवडणूक घ्या !

News Desk

आता सांगली आणि कोल्हापूरला देखील महापुराचा धोका….!

News Desk
व्हिडीओ

शिवसेनेच्या 4 कार्यकर्त्यांची हत्या होऊनही शिवसेना गप्प का ?

News Desk

मालाडमधील शाखा क्रमांक ३९ चे शिवसेना नेते आणि माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कुरारमधील गोकुळनगर परिसरात ही घटना घडलीय.

गोळीबारानंतर सचिन सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मालाड परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे.रुग्णालयाबाहेर आणि सावंत यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे..व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचे सध्या बोलले जात आहे. कुरार पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या आधी अहमदनगर आणि भिवंडीत शिवसेना नेत्यांची हत्या झाल्यानंतर रविवारी सचिन सावंत यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या 4 कार्यकर्त्यांची हत्या होऊनही शिवसेना गप्प का ? आतापर्यंत शिवसेनेच्या ४ कार्यकर्त्यांची हत्या झाल्यानंतर स्थानिक पातळीवर निषेध व्यक्त होत आहे परंतु या घटनेची पक्षाने विशेष दखल घेतल्याचे अद्याप दिसून येत नाहीये… या उलट विविध विषयांचे राजकारण करण्यात पक्ष प्रमुख गर्क आहेत परंतु ते कार्यकर्त्यांच्या हत्येसंदर्भात काहीच का बोलत नाहीत हे मात्र सामान्यांना विचार करायला भाग पाडत आहे…..

 

Related posts

कोण होणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल? ‘ही’ नावं चर्चेत

Manasi Devkar

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

News Desk

पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की…अजित पवारांचा भाजपवर निशाणा!

News Desk