HW News Marathi
महाराष्ट्र

चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी जाण्याची परवानगी, गरज लागल्यास विशेष एसटी बसेस सोडणार – अनिल परब

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवावर विघ्न आले आहे. त्यातच, चाकरमानी कोकणात गावी कसे जाणार हा मोठा प्रश्न पडला होता. त्याचे निरसन आज (१४ जुलै) मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत झाले आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.

दरम्यान, चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी जाण्याची परवानगी असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. गणपतीला चाकरमानी गावी जाणार असल्याने त्यासाठीचे नियोजन केले जात असल्याचेही परब यांनी स्पष्ट केले

गावी जाण्याची परवानगी जरी देण्यात आली असली तरी चाकरमान्यांमधील संभ्रम मात्र अद्याप दूर झाला नाही आहे. राज्य शासनाने याबाबत लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा व नियमावली निश्चित करावी, अशी मागणी सर्वच स्थरातून होत होती. त्यात क्वारंटाइन कालावधी १४ ऐवजी ७ दिवसांचा करावा, असा आग्रह सत्ताधारी शिवसेनेनेच धरला. या सर्व पार्श्वभूमीवर आज अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नव्या प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक झाली.

या बैठकीत चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी येणाऱ्या समस्यांवर चर्चा झाली. बैठकीबाबत अनिल परब यांनी नंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली. चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेणार असून त्यादृष्टीने विषय चर्चिले गेले. या बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊन त्यावर पुढील निर्णय होणार आहे, असे परब यांनी स्पष्ट केले.

चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणातील गावी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियम व अटी निश्चित केल्या जाणार असून त्यावर मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असेल, असेही परब यांनी सांगितले. गणपतीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातात. तसेच, एसटीच्या जास्त गाड्याही सोडल्या जातात. यंदा विशेष रेल्वेची शक्यता अगदीच धुसर आहे. याबाबत विचारले असता परवानगी मिळाल्यास चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बसेस सोडल्या जातील, असे परब यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आज गणेश चतुर्थी बाबत झालेल्या बैठकीवर भाजप नेते नितेश राणे यांनी अनिल परब यांना प्रश्न विचारला होता. कारण या बैठकीला राणे कुटुंबीयांपैकी कोणालाही बोलावले नव्हते. त्यामुळे ही फक्त शिवसेनेची बैठक होती का असा प्रश्न अनिल परब यांना नितेश राणे यांनी विचारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणावर भर द्या ! नाना पटोले

News Desk

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले”

News Desk

CBI, ED काहीही असू द्या, काहीही झालं तरी सरकार, आमदार, नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत – संजय राऊत  

News Desk