HW News Marathi
महाराष्ट्र

यशवंत सिन्हांची सीएए, एनआरसीविरोधात ‘गांधी शांती यात्रा’

मुंबई | नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या प्रमुख तीन कारणांसाठी ही शांती यात्रा काढण्यात आली आहे. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे काल (९ जानेवारी) माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ‘गांधी शांती यात्रा’ केली. या यात्रेची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्यामुळे देशात भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोपही सिन्हा यांनी काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. या यात्रेत वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, शत्रुघ्न सिन्हा, आशिष देशमुख आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी झाले होते.

देशभरात भाजप सरकारने चालविलेल्या अस्थिरतेच्या वातावरणाविरोधात जनजागृती करणे हा गांधी शांती यात्रेचा प्रमुख उद्देश होता. तसेच दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असून, तो भाजप सरकारच्या पाठिंब्याने झालेला आहे असा गंभीर आरोप सिन्हा यांनी केला. स्थानबद्ध् छावणी तयार करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील जागेची मागणी केल्याचाही त्यांनी दावा केला.

यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या या यात्रेचे कौतुक सरकारने नक्कीच केले पाहीजे, असे मत प्रकाश आंबेडकरांनी माध्यामांशी बोलताना मांडले. या यात्रेत मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवावा असे आवाहन मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. गेट वे ऑफ इंडियापासून सुरू होणारी ही गांधी शांती यात्रा मुंबई, पुणे, नाशिक, गुजरात, राजस्थानमार्गे नवी दिल्लीतील राजघाट येथे ३० जानेवारीला पोहोचणार आहे, असे सिन्हा यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे सगळं शरद पवारांचं नाटक”, किरिट सोमय्या संतापले

News Desk

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणजे हिंदी चित्रपटातील कन्हैयालाल चतुर्वेदी, कॉंग्रेसचा उपरोधिक टोला   

News Desk

राज्याच्या दृष्टीने पुढचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे, कोरोना ‘हे’ जागतिक संकट !

swarit