HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर

नाशिक-मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी काठावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदूर माधमेश्वर धरणातून पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर धरणातून सकाळी दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दारणा धरणातून सतरा हजार क्युसेक, कडवा धरणातून आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. रविवारी सकाळपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

आर्वीबेटाला पाण्याचा वेढा पुणे जिल्ह्यातील पावसामुळे भीमा नदीला पूर आला असून श्रीगोंदा तालुक्यातील आर्वीबेटाला पाण्याचा वेढा पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक झाली आहे. मुळा धरण ५५ टक्के तर भंडारदरा धरण ८७ टक्के भरले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने नद्यांना पूर आला आहे. गोदावरी नदीतून मोठया प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने जायकवाडीच्या साठ्यातही वाढ झाली आहे. मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवललेली असताना नाशिक जिल्हतील पूरस्थितीमुळे जायकवाडीचा साठा २५ टक्क््यांवर पोहोचला आहे. हे पाणी औरंगाबाद जिल्ह्याला वर्षभर पुरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सुनील शिंदेंना त्यांच्या त्यागाचं फळ मिळालं!”, – संजय राऊत

News Desk

‘त्या’ प्रकरणावरून अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा

Aprna

राज्यातील १० हजार किलोमीटर्सच्या ग्रामीण रस्त्यांची कामे होणार

News Desk