HW News Marathi
महाराष्ट्र

“अनिल परबांनी किमान मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखावा”

मुंबई | वेतनवाढ जाहीर केल्यानंतरही संपकरी एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम राहिल्याने काल (१० जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह राज्यातील एसटी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. मात्र, यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. 


पडळकर म्हणाले, “कुठल्याही युनियनचे सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवार यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयाबद्दल खुलेआम संघटनांच्याच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले”, असे पडळकरांनी म्हंटले आहे. तसेच मला अनिल परब यांना विनंती करायची आहे की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात, पण त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत?, असा सवाल त्यांनी परब यांना केला आहे. 

 “किमान उद्धव ठाकरेंनी जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा”

पुढे ते म्हणाले, “परब यांनी स्वत: भेटावं आणि ठामपणे कर्मचाऱ्यांना आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल. जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल. तसेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा”, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था 

News Desk

घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही – आदित्य ठाकरे

Manasi Devkar

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता आरक्षण द्यावे

swarit