HW News Marathi
महाराष्ट्र

ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावली,त्यांच्या घरात टोकाची भांडणं! पडळकरांचा शरद पवारांना टोला

पंढरपूर | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर कायमच महाविकास आघाडी सरकार आणि सरकारमधील नेत्यांवर टीका करत असतात. पवार कुटुंबीयांवर खासकरुन पडळकरांचा निशाणा असतो. अजित पवारांनी पडळकरांचं डिपॉझिट जप्त केले होते ,त्यावरुन अजित पवार आणि त्यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोप सुरु असतातच.ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावून घरं फोडली, त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

काय म्हणाले गोपिचंद पडळकर?

राष्ट्रवादीने बहुजन गोरगरीब समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ज्यांनी राज्यात घराघरात भांडणं लावून घरं फोडली, त्या शरद पवारांच्या घरात आता टोकाची भांडणं सुरु आहेत, अशी टीकाही गोपीचंद पडळकरांनी केली आहे. नियतीचा न्याय इथेच पाहायला मिळतो, असा टोलाही यावेळी लगावला आहे.

मेंढ्यांचे नेतृत्व कधी लांडग्याकडे नसते. आजवर राष्ट्रवादीने गोरगरीब बहुजन समाजाच्या घरावर गाढवाचा नांगर फिरवला. राष्ट्रवादी खूप हुशार आहे. त्यामुळेच नेहमी गृहमंत्री गरीब तोंडाचा पाहतात. ज्यामुळे चिल्लर त्याला आणि नोटा मात्र बारामतीला अशी व्यवस्था असल्याचे सांगत पडळकरांनी पवारांवर टीका केली आहे. पंढरपूरात प्रचारासाठी आले असता पडळकर बोलत होते.

पुढे ते असंही म्हणाले की, सचिन वाझे प्रकरणात अनिल देशमुख यांनी राजीनामा देताच जयंत पाटील खुलले होते. मात्र शेवटी गृहमंत्रीपद गरीब अशा वळसे पाटील यांना दिल्याचे पडळकर यांनी सांगितले. तुमच्या ३५ गावाला पाणी न देण्याचे कारण देखील तसेच होते. जर तुम्हाला पाणी दिले असते तर यांचा ऊस कुणी तोडला असता असं ते म्हणाले. राज्यात सीबीआयला येऊ देणार नाही म्हणणारे माजी गृहमंत्री आता त्यांच्याच चौकशीला सामोरे जात आहेत, असंही पडळकर यावेळी म्हणाले आहेत.

ईडीची नोटीस आल्यानंतर तुम्हाला राज्याने रडताना पाहिलेय !

“अजित पवारांचे बोलणं टग्याचं आणि रडणं बाईसारखं अशी गत आहे. ईडीची (ED) नोटीस आल्यानंतर तुम्हाला राज्याने रडताना पाहिलेले आहे. अजित पवारांचे सगळे राजकारणच चुलत्यांच्या जीवावर आहे. पण आमचे राजकारण हे बारा बलुतेदार आणि गोरगरिबांच्या पाठींब्यावर आहे”, असेही यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

अजित पवारांनी स्वतःची लायकी काय हे इथल्या लोकांना सांगावे !

अजित पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “माझ्यावर टीका करण्याआधी अजित पवारांनी स्वतःची लायकी काय आहे हे इथल्या लोकांना सांगावे. माझं डिपॉझिट जप्त झाले हे जगजाहीर आहे. पक्षाने आदेश दिल्यानंतर मी माझा हक्काचा मतदारसंघ सोडून बारामतीत येऊन निवडणूक लढलो. मला लोकांनी नाकारले. मात्र, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारही मावळमध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढला. तिकडे त्यालाही अपयश आले. तेव्हा काय झालं?” असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांना डिवचले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापुरातील कार्यक्रमात नितीन गडकरी यांना भोवळ

News Desk

‘दिलीप कुमारांचं निधन म्हणजे देशाचं मोठं सांस्कृतिक नुकसान’, पंतप्रधानांचा सायरा बानोंना फोन

News Desk

मोठी बातमी! आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला धक्कादायक वळण, बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीच्या घरावर NCB चा छापा

Ruchita Chowdhary