HW News Marathi
महाराष्ट्र

सरकारकडून शेतकऱ्यांना खुशखबर, २० एप्रिलपासून कापूस विक्री होणार सुरु

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रातही या लॉकडाऊनमूळे अनेक उद्योगधंदे, व्यापार, हे ठप्प आहेत. मात्र, आता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. राज्यात २० एप्रिलनंतर सरकारकडून कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. काल (१७ एप्रिल) या संदर्भात बैठक झाली. दरम्यान, जरी खरेदी सुरु केली तरी सोशल डिस्टन्सिंग पाळूनच ही खरेदी-विक्री करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या खरेदी आणि विक्रीसाठी ऑनलाईन बुकींग आणि फोन बुकींगचा वापर केला जाणार आहे. तसेच, बुकींग केल्यानंतर शेतकऱ्यांना केंद्रावर येण्याचा दिवस आणि वेळ सांगण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, कृषी संदर्भातील कोणत्याही कामांना आणि वाहतूकीला अडथळा न करण्याचे निर्देश सरकारने या आधीही दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकार विरोधात पहिल्यांदाच महाराष्ट्र बंदची हाक, महाविकास आघाडीची घोषणा!

News Desk

काश्मीरमध्ये पोलिस अधिकाऱ्याची दगडानं ठेचून हत्या

News Desk

राज्य सरकारची शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना फसवी निघाली !

News Desk