HW News Marathi
महाराष्ट्र

मंगळवेढा तालुक्यात भारत भालके यांच्या गटाला धक्का, शिवसेनेने मारली बाजी

पंढरपूर | मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या गटाला धक्का बसला. २२ पैकी १३ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे समाधान आवताडे गटाचा विजय झाला आहे. मंगळवेढा तालुक्यात शिवसेनेचे समाधान अवताडे, आमदार प्रशांत परिचारक, भारत भालके यांचे गट कार्यरत आहेत. तांबडी, तांडोर, आरळी, सिद्धापूर, नंदेंश्वर और या गावात लक्षवेधी निवडणूक रंगली होती. हुलजंती गावात शिवसेनेच्या समाधान आवताडे गटाने एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले होते.

विटे ग्रामपंचायतीत २ उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. दोन्ही उमेदवारांना १४४ मते मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढून कौल घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चिठ्ठी काढल्यानंतर भालके गटाच्या रुक्मिणी पुजारी विजयी झाल्या. ग्रामपंचायतीत भालके गटाकडे ४ विरुद्ध ३ जागा आल्या.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या १८६ जागांसाठी ४६४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मंगळवेढ्यात २१ गावांमध्ये दुरंगी लढत झाली, तर सीमावर्ती भागात असलेल्या मरवडे या गावात तिरंगी लढत झाली होती. यात भारत भालके यांच्या गटाला शिवसेनेने धक्का दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांनी केले निंबाळकरांच्या पुतळ्याचे दहन

News Desk

सर्वोच्च न्यायालयने कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली

News Desk

संजय राऊतांनी हक्कभंग नोटीसला दिले उत्तर; पत्रात म्हणाले…

Aprna