HW News Marathi
महाराष्ट्र

“तत्कालीन फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे”, हसन मुश्रिफांचं विधान

कोल्हापूर । केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी पुनर्विचाराची याचिका फेटाळल्याने राजिक्य वातावरण तापलं आहे. सत्ताधारी सरकार आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये वादविवाद सुरु झाले आहेत. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारनेच मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

हे लोक सत्तेवर आल्यावरच इम्पिरीकल डाटा मिळणार आहे का?

आज (२ जुलै) हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे, असे म्हणत राज्याला आरक्षण टिकवता आले नाही, असे म्हणणारे आता गप्प का आहेत? असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केली आहे. तसेच, हे लोक सत्तेवर आल्यावरच इम्पिरीकल डाटा मिळणार आहे का?, असा सवाल करत इम्पिरीकल डाटा मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. याचबरोबर, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार स्वस्थ बसणार नाही. सत्तेवर आलेल्या पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्याचा ठराव करणारा भाजपा हा पहिलाच पक्ष आहे. जनता हे फार काळ सहन करत नाही, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.

पत्रकार परिषदेत दिल्या घोषणा

हसन मुश्रीफ ह्यांचा पत्रकार परिषदे मध्ये संभाजी ब्रिगेड यांचे कार्यकर्ते तिथे घुसले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे मुश्रीफ यांना पत्रकार परिषद थांबवावी लागली. मात्र, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने पत्रकार परिषद सुरू झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे! – उच्च न्यायालय

Aprna

साखर कारखान्याच्या अध्यक्षांची गोळी झाडून आत्महत्या

News Desk

महाडिक,नरके,मुश्रीफ ,मंडलीक घराण्यातल्या शिलेदारांचं गोकुळ निवडणुकीत काय झालं ?

News Desk