HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांड म्हणजे महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणींची आज (१० फेब्रुवारी) ६.५५ मिनिटाने तिचा मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून पीडितेला रक्तदाब खालावत होत, असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितले. पीडितेला नागपूरच्या ऑरेंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसापासून पीडित तरुणी मृत्यूशी झुंज देत होती. हे जळीत कांड महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे आणि पीडितेचा मृत्यू झाला नसून ही हत्या आहे. त्यामुळे त्या आरोपीला तातडीने शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरुणीच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंनी ट्विटरवरुन अत्यांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. हिंगणघाट जळीत प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून हा एकप्रकारे खूनच आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण फास्ट कोर्टात चालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी. या आरोपीसह इतरांनाही धाक बसेल अशा प्रकारे काही तरी करणे गरजेचे आहे. संपूर्ण महाराष्ट्र छेडछाड मुक्त करणे गरजेचे आहे. प्रत्येक मुलीला निर्भयपणे जगता यायला हवं, असे ही मत सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे मांडले.

पीडितेचे आई-वडील कोणत्या मानसिकतेतून जात असतील याची कल्पनाही करवत नाही. पीडितेच्या मृत्यूने तिचे आईवडिलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. तिच्या कुटुंबीयांना आधाराची गरज आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने पुढे येण्याची गरज आहे, असेही सुळे म्हणाल्या. दरम्यान अनेकांनी पीडितेच्या मृत्युबद्दल हळहळ आणि संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त करत याप्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुनावणी होणार असून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी देशातील अजून एका निर्भयाचा मृत्यू झाला अशी भावना व्यक्त करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर या घटनेनंतर समाजाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC आयुक्त इक्बालसिंग चहल यांना आयकर विभागाची नोटीस

Aprna

“आंदोलनजीवी म्हणत हिणवलेल्या शेतकऱ्यांचा अखेर विजय” – नाना पटोले

News Desk

राष्ट्रभक्तीची भावना मनात सतत तेवत ठेवा! – उपमुख्यमंत्री

Aprna