HW News Marathi
महाराष्ट्र

मी गद्दारांना विचारत नाही, आव्हाडांनी नाईक पिता-पुत्रांवर टीका

नवी मुंबई। “काय केले या नाईकांनी. जे झाले ते काँग्रेसच्या माध्यमातून झाले. आता दिवस संपले. माझे देखील आयुष्य यांनी खराब केलं, माझे कुटुंब देखील खराब केलं, शरद पवार यांना सांगितले आम्ही जाणार नाही आणि भाजपत गेले. अशा गद्दारांना मी विचारत नाही. संजीव नाईक यांना मी विचारत नाही”, असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी नाईक पिता-पुत्रांवर टीका केली. येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होतेय. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोपरखैरणेत पार पडलेल्या सभेत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला.

“काही लोकांचे नाशीब आहे, ते शिवसेनेकडे गेले आणि त्यानंतर पवारांकडे आले. सत्तेसाठी काय काय करायचे हे नाईकांना माहित आहे. गणेश नाईक कोणीही नाही, ते स्वतःचे खिशे भरण्यासाठी लढले. मंदा म्हात्रे यांना नाराज केले. गणेश नाईकमुळे ते पक्ष सोडून गेले. गणेश नाईकमुळे विजय चौघुले यांचे देखील तिकीट कापले.” गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. नवी मुंबईतील कारखाने, दगडखाणींकडून ते खंडणी वसूल करत असल्याचा गंभीर आरोप आव्हाडांनी नाटकांवर केला. तसेच येथील कारखाने, दगडखाणींमधून खंडणी वसूल करणाऱ्या नाईकांची सल्तनत नेस्तनाबूद करण्याचं आवाहन आव्हाड यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय मंडलीक गटाला धक्का ! विरेंद्र मंडलीक यांचा पराभव

News Desk

कपिल पाटील यांचं मनसे नेत्याकडून स्वागत!

News Desk

राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिला प्रदेश महासचिवपदाचा राजीनामा

Aprna