HW News Marathi
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंच्या बद्दलत्या भूमिकांबदल पीएचडी करावी”, राऊतांचा टोला

मुंबई | भोगी कोण आणि योगी कोण?, राज ठाकरेंचे योगींबाबत मत परिवर्तन कसे झाले?, हा तर खरा संशोधनाचा विषय आहे. विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंच्या बद्दलत्या भूमिकांबदल पीएचडी करायची असेल, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल (२८ एप्रिल) पत्र ट्वीट केले आहे. या पत्रात राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरील भोंग उतरविल्याबद्दल त्यांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. राज ठाकरेंनी पत्र ट्वीट केले असून यात महाविकासआघाडी सरकारचा उल्लेख “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!”, असे म्हटले होते. यावर राऊतांनी आज (२९ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना राज ठाकरेंवरी तोफ डागली. 

राऊत म्हणाले, “उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत.  त्यांनी फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात केले आहे. अशा प्रकारचे पालन महाराष्ट्रातही करावे, अशीच सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकारने नेहमीच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करवा. यामुळे हा भोंग्यांचा विषय आहे, सध्या राजकीय वातावरण तापण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही काय भोंगेबाजी आता भोगी योगी कोण आणि योगी कोण?, भोगीसंदर्भात मतपरिवर्तन कसे झाले? , हा तर खार संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थयाला राज ठाकरेंच्या बद्दलत्या भूमिकांबदल पीएचडी करायची असेल, तर त्यांनी करायला हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे.”           

राज ठाकरे योगीबद्दल नेमके काय म्हणाले

राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटले, “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचीरणी प्रार्थना.” या ट्वीटमध्ये त्यांनी अजान आणि लाउडस्पीकर ट्वीट दिले आहे. या ट्वीट राज ठाकरेंनी मराठी आणि इंग्रजीत पत्र लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजांनंतर प्रीतम मुंडेंचाही धनंजय मुंडेंवर टीकांचा वर्षाव!

News Desk

राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान जवळपास ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

News Desk

“मुख्यमंत्री समाजामध्ये व प्रांतांमध्ये तेढ निर्माण करत आहेत!”, भाजप मंत्र्यांचा आरोप

News Desk