HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचे अजून किती बळी सरकारला हवेत? दरेकरांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई। एसटी महामंडळाचा राज्य सरकारमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अशातच ठिकठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित आघाडी आणि भाजपाने पाठींबा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर मंत्रालयावर आज एसटी कर्मचाऱ्यांचा मोर्चा धडकला आहे. मात्र राज्यभरातून आलेल्या काही एसटी कर्मचाऱ्यांना मानखुर्द जकात नाक्यावर पोलिसांकडून अडवण्यात आले. यावेळी मानखुर्दजवळ एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर य़ांनी देखील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. आत्तापर्य़ंत ३७२ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. यावेळी प्रविण दरेकर यांनी “३९ कर्मचारी आपल्या प्राणाला मुकले. अजून किती कर्मचाऱ्यांचे बळी सरकारला हवे आहेत? असा सवाल उपस्थित केला.

दडपशाहीतून महिला भगिनींची सूटका नाही

“एसटी कर्मचारी जीवाला वैतागले आहेत. जिवंत असून मेल्यासारखं कसे जगायचे? या मानसिकतेतील कर्मचाऱ्यांच्या संवेदना जर सरकारला कळत नसतील तर एवढं असंवेदनशील सरकार मी कधी पाहिले नाही. एसटी कर्मचाऱ्यांसोबत सरकारने जुलमी दडपशाही करु नये अशी विनंती आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका.” अस दरेकर म्हणाले.“सरकारच्या दडपशाहीतून महिला भगिनींची सूटका नाही, आपल्या मुला-बाळांसह मुंबईत या महिला कर्मचारी न्यायहक्कासाठी येत आहेत त्यांनी मध्येच थांबवण्यात आलेय. डांबून, कोंडून ठेवण्यात आले, अशा जुलमी पद्धतीने दडपशाही कधीच या राज्यात पाहिली नाही.” अशी टीका दरेकरांनी केली.

त्यांनी माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना १४ कोटी ५६ लाखाच्या बोगस नोटांचे प्रकरण दाबून टाकलं, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांच्या आरोपांना माझं ट्विट पुरेसं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे. तसंच, आमदार आशिष शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा त्याला जास्त काही वजनही नाही आहे. त्यामुळे त्याला कशाला वजन देता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपवताना कळवळा कुठे होता?”,रोहिणी खडसेंचा फडणवीसांना सवाल

News Desk

मुस्लिमांना खूश करण्यासाठी राम मंदिराबद्दल वक्तव्य केलं का? दरेकरांचा पवारांना सवाल

News Desk

गर्भलिंग निदान करणाऱ्या सेंटरवर कडक कारवाई! – राजेश टोपे

Aprna