HW News Marathi
Covid-19

“शरद पवारांना असा मुख्यमंत्री चालतो कसा ?”, नारायण राणेंचा बोचरा सवाल

सिंधुदुर्ग | यंदाच्या राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गदारोळ पाहायला मिळाला आहे. आजपासून (५ जुलै) सुरु झालेले राज्याचे पावसाळी अधिवेशन भाजप आमदारांचा गदारोळ आणि भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन यामुळे चांगले गाजले आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित वादग्रस्त मुद्दे असतानाच आता पुन्हा एकदा या नव्या मुद्द्यांवरून राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. त्यातच आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना सवाल करत थेट उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले आहे.

नारायण राणे म्हणाले कि, देशात गेली दिढ वर्ष कोरोनाच संकट आहे. राज्यात कोरोनामुळे एक लाख तीस हजार लोकांचा मृत्यू झाला. त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांना त्याचं गांभीर्य नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाही. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?, असा अत्यंत बोचरा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

ठाकरे सरकारने १२ आमदारांना निलंबित केलंय | नारायण राणे

यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे मांडले जाणार आहेत अशी अशा आहे. तरी पहिल्या दिवशी १२ आमदारांना पुढच्या वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत. आमदारांच्या निलंबनावरूनही राणे यांनी मोठं विधान केलं. “सरकार वाचवण्यासाठी ठाकरे सरकारने १२ आमदारांना निलंबित केलंय. त्यांनी आमच्या बारा आमदारांचं निलंबन केलं असलं तरी त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे”, असा गौप्यस्फोटही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्जदारांना मोठा दिलासा, कर्ज न भरण्याची मुभा आणखी ३ महिन्यांनी वाढवली

News Desk

कोटाहून विद्यार्थ्यांना आणण्यास एसटी सज्ज, पण राज्य शासनाकडून आदेश नाही

News Desk

मी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवलेला नाही, ते न्यायालयाचेच आदेश !

News Desk