HW News Marathi
देश / विदेश

HW Exclusive | प्रत्येकवेळी महाविकासआघाडीत वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न !

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सध्या दुसरा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह देशातील आणि राज्यातील नेतेमंडळी देखील आपल्या घरातूनच काम सांभाळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, एच.डब्ल्यू. मराठी या लॉकडाउनच्या काळामध्ये राज्यातील नेतेमंडळींशी संवाद साधत आहे. एच. डब्ल्यू.मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी आज (२४ एप्रिल) कोरोना, राज्यातील परिस्थिती आणि भाजपकडून होणारे राजकारण या सगळ्यासंदर्भात राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना “चंद्रकांत पाटील हे महाविकासआघाडीमध्ये आग लावत आहेत”, असे रोहित पवार नेमके का म्हणाले ? तसेच रोहित पवार यांनी भाजपच्या टीकेला नेमके कसे प्रत्युत्तर दिले ? जाणून घ्या.

प्रत्येकवेळी महाविकासआघाडीमध्ये वाद निर्माण करायचा भाजपचा उद्देश !

“चंद्रकांत पाटील आज म्हणाले कि महाविकासाआघाडीच्या नेत्यांनाच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नको आहेत. भाजपला आपण एकंदरच नागपूर आणि मुंबईच्या विधानसभा अधिवेशनात पाहिले आहे कि प्रत्येकवेळी महाविकासआघाडीमध्ये वाद निर्माण करायचे आणि भांडण लावायची हा इतकाच भाजपचा हेतू होता. देशाच्या, राज्याच्या सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीचा वाद चालेल का ? सर्वसामान्य लोकांना आता सध्या आपण ज्या संकटात अडकलो आहोत त्या आर्थिक, आरोग्यविषयक संकटातून बाहेर पडायचे आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांना त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. सर्वसामान्यांना काय हवे आहे ? त्याविषयी त्यांना बोलायचे नाही”, अशा शब्दात रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

सगळं पारदर्शकपणे सुरु असताना भाजपला राजकीय खेळी खेळायची आहे !

“राज्य सरकारच्या ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे ते पाहता महाविकासाआघाडीचे सरकार पूर्णपणे स्थिर आहे, हे लक्षात येईल. मात्र, भाजपच्या नेत्यांकडून जी दुहेरी भूमिका घेतली जात आहे त्यावरून भाजपच्या नेत्यांचे मन किती चंचल आहे ते समजते. भाजपच्या नेत्यांकडून एकदा एक भूमिका घेतली जाते आणि मग लोकांचा विरोध झाला कि लगेच भूमिका बदलली जाते. मुळात या नेत्यांपैकी अनेकांच्या फक्त टीका आणि प्रतिक्रिया येतात. त्यांनी काहीही सामाजिक काम केलेलं दिसत नाही. एखाद्या प्रकरणाबद्दल उदाहरणार्थ पालघरबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण आणि कारवाईचे आदेश देण्यात आल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सगळं काम सुरळीत आणि पारदर्शकपणे सुरु असताना उगाचच एखादी राजकीय खेळी खेळण्यासाठी भाजपकडून हा प्रयत्न होत आहे”, असे रोहित पवार एच.डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शरद पवारांकडून अमित शहांना खास आमंत्रण’, पुण्यात होणार दुसरी भेट

News Desk

भय्यूजी महाराजांच्या कन्येने दिला मुखाग्नि, पंचत्वात विलीन

News Desk

कोरोना सर्टिफिकेटवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो काढून टाकावा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश

News Desk