HW News Marathi
महाराष्ट्र

“गेल्या अडीच वर्षांपासून फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ वाक्य ऐकतोय, ते…”, जयंत पाटलांची खोचक टीका!

मुंबई। राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपा आणि सत्ताधारी यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण सुरू असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली “मी पुन्हा येईन” ही हाक विशेष चर्चेत राहिली. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी अनेकदा खोचक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या त्याच वाक्याचा संदर्भत घेत पुन्हा एकदा खोचक टोला लगावला आहे. शिर्डीमध्ये पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या या दोघांनाही लक्ष्य केलं.

जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे. ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होत असल्याची टीका होत आहे. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी मेळावे घेत नाही. मी आमचे जे मतदारसंघातील पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय त्यांचे जे काही प्रश्न असतील संघटनांतर्गत कामंसाठीची चर्चा आम्ही करतोय. हा परिवारातला अंतर्गत संवाद आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

सोमय्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही

किरीट सोमय्या विरोधात आहेत त्यामुळे विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही असे म्हणत जयंत पाटील यांनी सोमय्या यांच्या आरोपांना किंमत दिली नाही. शिर्डी येथे श्रीरामपूर आणि रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा व परिवार संवाद साधण्यासाठी जयंत पाटील आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी जयंत पाटील यांनी जोरदार फिरकी घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 ‘अनाथांची माय’ काळाच्या पडद्याआड! सिंधुताई सपकाळ यांचं निधन, सर्व स्तरांतून मोठी हळहळ

Aprna

JNU मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून वाद; काय आहे नेमके प्रकरण

Aprna

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात इमारतीला आग, कोणतीही जीवीतहानी नाही

News Desk