HW News Marathi
महाराष्ट्र

“मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही?”, इम्तियाज जलीलांनी उठवला सवाल

मुंबई | राज्यात सध्या केंद्रीय मंत्र्यांची जनाशीर्वाद यात्रा सुरु आहे. या यात्रेवर विरोधक आता टीका करत आहेत. भाजपच्या दोन्ही केंद्रीय राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जनशीर्वाद यात्रेतील गर्दी प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे.

मग मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही?

केंद्रीय मंत्र्यांच्या जनाशीर्वाद यात्रेमुळे गर्दी होत आहे. औरंगाबाद आणि मराठवाड्यात रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली. याच गर्दी प्रकरणी मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. तसंच एमआयएमवर गुन्हे दाखल करता मग मंत्र्यांवर गुन्हे दाखल का करत नाही, असा सवालही त्यांनी यावेळी पोलिस प्रशासनाला विचारला आहे.

भाजपच्या राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का?

इम्तियाज जलील म्हणाले, “माझ्याकडे एक व्हिडीओ आला आहे, ज्या व्हिडीओत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं कार्यकर्ते स्वागत करताना दिसून येत आहे. यामध्ये दानवेंनी मोठी गर्दी जमवली आहे. तसंच दुसरे मंत्री भागवत कराड यांच्याही जनआशीर्वाद यात्रेत मोठी गर्दी होती”

“परवा स्वातंत्र्यदिनाला आम्ही आंदोलन केलं. पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. आमच्या स्वार्थासाठी ते आंदोलन केलेलं नव्हते. जिल्ह्याच्या विकासासाठी ते आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर माझ्यासह माझ्या 24 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मग आता मला पोलिसांना विचारायचंय, की आमच्यावर फटाफट गुन्हे दाखल करता मग आता भाजपच्या राज्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का? आणि करणार नसाल तर का करणार नाही?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पोलिस प्रशासनाला केला आहे.

गुन्ह्यांची संख्या ३६ वर

जनाशीर्वाद यात्रेवर आता पर्यंत ३६ गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये सात वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्याच मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक मृतदेह सापडला

News Desk

लस खरेदीचे 7 हजार कोटी वाचल्याने बारा बलुतेदार, शेतकऱ्यांना पॅकेज द्या, भाजपची मागणी

News Desk

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती

swarit