HW News Marathi
महाराष्ट्र

अयोध्येत बौद्धांनाही जागा द्यावी !

वर्धा । सध्या राम मंदिराचा मुद्दा देशभर चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक नवीन प्रस्ताव सरकारसमोर मांडला आहे. “अयोध्येत हिंदू, मुस्लीम तसंच बौद्धांनाही जागा द्यावी. हिंदुंनी मंदिर बांधावं, मुस्लिमांनी युनिर्वसीटी बांधावी, आम्ही बौद्ध मंदिर बांधू”,असा प्रस्ताव वर्धामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मांडला आहे.

“राम मंदिराचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. काही लोकांच्या मते प्राचीनकाळी याठिकाणी बुद्ध मंदिर होते. ते पाडून राम मंदिर बांधण्यात आले. यानंतर तेथे मशीद बांधण्यात आली. मात्र, आता यावर तोडगा काढायचा असेल तर हिंदू धर्म मोठा असल्याने त्यांना जास्त जागा द्यावी. काही भाग मुस्लिमांना द्यावा, काही भाग आम्हाला द्यावा. जेणेकरून यावर तोडगा निघेल”, असे आठवलेंनी सांगितले.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने राम मंदिराच फैसला अजूनही झालेला नाही. मात्र,संघ आणि भाजपच्या नेत्यांकडून राम मंदिरासाठी सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणी केली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक महापालिकेत ४ वेळा निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवका कल्पना पांडेंचं कोरोनामुळे निधन 

News Desk

मंत्रालयासमोर सरकारी कर्मचा-याचा आत्मदहनचा प्रयत्न

News Desk

बर्ड-फ्लूची भीती पळवण्यासाठी नागपूरमध्ये चिकन- अंडी महोत्सवाचे आयोजन

News Desk