HW News Marathi
महाराष्ट्र

#Vidhansabha2019 : कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष

मुंबई। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना-भाजपची युती झाली आहे. मात्र, कणकणली आणि देवगडमध्ये शिवसेना-भाजपमध्ये कलगी तुरा पहायला मिळणार आहे. यामुळे कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना अशी दुहेरी लढत होणार आहे. राज्यात युती झाली तरी कोकणात नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे हे भाजपचे उमेदावार आहेत. तर शिवसेनेने सतीश सामंत उमदेवार आहे. कारण सतीश सामंत यांनी शेवटच्या दिवशीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. राणे विरोधात सामंत अशी लढत निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

सतीश सामंत हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक समजले जात होते. मात्र नाराजीनंतर सामंत यांनी राणेंची साथ सोडली आणि शिवसेनेने सामंतांना उमेदवारी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे त्यांच्या मुलांसह भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, नितेश राणेंनी शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने एबी फॉर्म भरत पक्षात प्रवेश केला आहे.

शिवसेना युती धर्म पाळेल आणि नितेश राणेंना सहकार्य करेल, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. मात्र शिवसेनेने राणेंविरोधात युती धर्म पाळला नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. त्यामुळे कोकणातील शिवसेना-राणे संघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी महामंडळाला १५ कोटीचे नुकसान, कर्मचाऱ्यांचा आजही संप सुरुच

News Desk

“आमचे तोंड उघडले तर…” देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Aprna

मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही – अनिल देशमुख

News Desk