HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात – मुख्यमंत्री

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० डिसेंबर) जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. संवाद साधताना सुरु करताच त्यांनी राज्यात पसरलेल्या कोरोना संकटावर भाष्य केले. पुर्णपणे कोरोना काकू करु शकलो नाही तरी आपण कोरोना नियंत्रण केले आहे असेही त्यांनी म्हटले. आज जवळपास सगळ्या गोष्टी सुरु झाल्या आहेत. लोकांनी सर्व नियम काटेकोरपणे पाळले. तसेच, कोरोनाचे आकडे पारदर्शकपणे मांडले आहेत. त्यामुळे कोरोना काही अंशी नियंत्रणात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आता हिवाळा सुरु झाला त्यामुळे हिवाळ्यातील आजाराचा सुरुवात झाली. त्यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी मास्क लावणे गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले की लस आली तरीही मास्क लावणे गरजेचे आहे. किमान पुढचे ६ महिने तरी मास्क लावणे गरजेचे आहे. आणि युरोपात जसा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे तसा पुन्हा आपल्या राज्यात लावण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आणि नाईट कर्फ्यू लावायचा नसल्यास अजूनही जे लोकं मास्क लावत नसतील त्यांनीही काळजी घेणं गरजेचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विचारांवर श्रध्दा आणि विधानांवर ठाम, बाळासाहेबांना आदरांजली वाहत फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला 

News Desk

शरद पवार ब्रीच कँडीमध्ये दाखल, उद्या पित्ताशयावर होणार शस्त्रक्रिया

News Desk

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला इशारा, तर आम्ही उरलेले दोन पक्ष एकत्र राहू….

News Desk