HW News Marathi
महाराष्ट्र

विकास करत आणि राजकीय हल्ले परतवत सरकारने १ वर्ष पुर्ण केले!

मुंबई | प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० डिसेंबर) सडेतोड उत्तरे दिली आहेत. गेले अनेक दिवस महाविकासआघाडीचं सरकार पडेल असं भाजप बोलत होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी पलटवार करत उत्तर दिले आहे. गेल्या 28 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीने एक वर्ष पूर्ण केले आहे. हे सरकार आज पडेल, उद्या पडेल म्हणून अनेकजण डोळे लावून बसले होते. पण सरकार पडलं नाही, विकास करत आणि राजकीय हल्ले परतवत या सरकारने एक वर्षे पूर्ण केलं आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला नाव न लगावला आहे.

नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यामुळे ते जनतेला काय आवाहन करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावरून राज्यातील जनतेला सावध करतानाच भाजपला चिमटेही काढले आहेत. तसेच, मी विकास कामांची आढावा घेत आहे. आणि विकास कामात घाई केली तर विकास होत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. विकासाचे पुढील परिणाम बघून केला पाहिजे. खोटा विकास नको आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक

News Desk

नमस्कार, मी अजित पवार बोलतोय, जामगावच्या दिव्यांग चित्रकाराला जेव्हा उपमुख्यमंत्री फोन करतात…

News Desk

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक

News Desk