HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीचाही काँग्रेसला इशारा, तर आम्ही उरलेले दोन पक्ष एकत्र राहू….

मुंबई । काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढेल असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर राज्यात या मुद्द्यावरून चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असेल तर महाविकास आघाडीतील दोन पक्ष अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र निवडणूक लढवतील याबाबत शिवसेनेच्या सामनाच्या अग्रलेखातुन मांडण्यात आलं. या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे.

जयंत पाटील म्हणाले की महाविकास आघाडी मध्ये तीन पक्ष एकत्र आहेत आणि या तीनही पक्षांनी एकत्र राहायला प्राधान्य दिले पाहिजे. परंतु, त्यामधून ही एखाद्या पक्षाची स्वबळावर निवडणूक लढण्याची इच्छा असेल तर उर्वरित दोन पक्ष एकत्र राहतील. या दृष्टिकोनातून सामनातून मत व्यक्त केलेले दिसते. असं मंत्री जयंत पाटील म्हटले.

पुढे जयंत पाटील असे देखील म्हणालेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या स्वबळावर निवडणूक लढवायच म्हणतायेत. पक्ष वाढवण्यासाठी कदाचित ते म्हणत असतील. परंतु, शेवटी प्रत्येक पक्षाच बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच परिचित आहे. त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटित काम करणे अपेक्षित आहे. ते आज जरी असं म्हटले तरी निवडणुका जवळ आल्यावर ते कदाचित वेगळा विचार करू शकतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं, गृहमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

News Desk

“फडणवीसजी काय राव तुम्ही तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण घराबाहेर यावं लागतं”, चित्रा वाघ यांचा टोमणा

News Desk

मुंबईत पहाटे पावसाने लावली हजेरी

News Desk