HW News Marathi
Covid-19

राज्यात आज १४ हजारांहून नवे कोरोनाबाधित, तर २९५ मृत्यू

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज (२६ ऑगस्ट) जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १४ हजार ८८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, आता राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७ लाख १८ हजार ७११ वर पोहोचला आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत २९५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेता राज्यात विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची अर्थात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ७२ हजार ८७३ इतकी आहे. तर दिलासादायक बाब अशी कि राज्यात आतापर्यंत तब्बल ५ लाख २२ हजार ४२७ जण हे कोरोनामुक्त झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ निर्णयाबद्दल एकता कपूर यांनी मानले आभार

News Desk

१२ हजार ऊसतोड मजूर बीड जिल्हयात परतले, चेक पोस्टवर वैद्यकीय तपासणी करूनच जिल्हयात प्रवेश

News Desk

आमदारकीची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट

News Desk