HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थांनी देखील लावले टाळे

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने गर्दी टाळण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील अनेक मंदिरे बंद करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचा समावेश आहे. तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर, शेगावचे गजानन महाराज मंदिर, नृसिंहवाडीचं दत्त मंदिर, जेजुरीचं खंडोबा मंदिर मंगळवारपासून (१७ मार्च) दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. तर शिर्डीचे साईबाबा मंदिरही दुपारी तीन वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गणपतीपुळे, मुंबादेवी, परळी वैद्यनाथ मंदिरंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल आहे.

परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. इतिहासात पहिल्यांदाच वैद्यनाथ मंदिर बंद करण्यात आल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसून आली. कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठा प्रमाणात वाढत आहे. त्याला रोखण्यासाठी सरकारनं मंदिरांना केलेल्या आवाहनाला शेगावच्या गजानन महाराज मंदिरानंही प्रतिसाद दिला आहे. बुलडाणातील शेगावमधील गजानन महाराजांची दर्शन सुविधा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. तर गजाजन महाराज संस्थानचे सर्व उत्सव आणि कार्यक्रम 30 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तांची गर्दी वाढून कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचा विसर पडला का? राज्यपालांचा पत्रातून प्रश्न

News Desk

सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय! गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची कोठडी

Aprna

एक खून माफ करा, राज ठाकरेंची राष्ट्रपतींकडे मागणी

News Desk