HW News Marathi
Covid-19

देशात ८६,९६१ नवे रुग्ण तर राज्यात २६,४०८ रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली | देशात रुग्ण वाढ सुरूच आहे. गेल्या २४ तासांत देशात ८६,९६१ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ११३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण आकडा आता ५४,८७,५८१ इतका झाला आहे. आत्तापर्यंत ४३,९६,३९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ८७,८८२ रुग्णांचा आत्तापर्यंत देशात मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २०,५९८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या २४ तासात २६,४०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका दिवसात राज्यात ४५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा मृत्यूदर हा २.७ टक्के झाला आहे.

राज्यात रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ७३.१७ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ८,८४,३४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५८,७२,२४१ रुग्णांची कोरोना चाचणी झाली असून १२,०८,६४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद; BMC निर्णय

Aprna

राज्याला दिलासा ! नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला

News Desk

मातोश्री बाहेरील ३ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

News Desk