HW News Marathi
महाराष्ट्र

मानधनवाढ होऊनही संप सुरु ठेवणे चुकीचे -मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, मानधनवाढीची मागणी शासनाने मान्य केलेली असताना देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी अजुनही संप सुरु ठेवला आहे. हे चुकीचे असून उर्वरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घेऊन सेवेवर रुजू व्हावे, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागणीस अनुसरुन आमच्या शासनाने मागील तीन वर्षात दोन वेळा मानधनवाढ केली आहे. २०१४-१५ मध्ये २८९ कोटी रुपयांची तर आता साधारण ३६३ कोटी रुपयांची ऐतिहासिक मानधनवाढ केली आहे. अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची मानधनवाढ करण्यात आली आहे. त्यांच्या एकूण मानधनाच्या ३० टक्के इतकी ही वाढ आहे. यापुर्वी एका वेळेस इतकी मानधनवाढ कधीही देण्यात आली नव्हती. याशिवाय भाऊबीजही दुप्पट करण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन व इतर मागण्यांबाबत भविष्यात अजुनही निर्णय घेण्याबाबत शासन पूर्ण सकारात्मक आहे. पण आत्ताच मानधनवाढ दिली असताना ती मान्य न करता अधिक मानधनवाढीसाठी बालकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नसून उर्वरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मागे घेऊन सेवेवर हजर व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यापुढे केवळ बीएस-IV मानकांच्या वाहनांचीच नोंदणी होणार

News Desk

नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी एल्गार, ४ जिल्ह्यांत आंदोलन

News Desk

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न

Aprna