HW News Marathi
महाराष्ट्र

Hw Exclusive : सांगली कोरोनामुक्त होण्यामागचे ‘हे’ खरे कारण जयंत पाटील यांनी सांगितले

मुंबई | आधी माणसे वाचली पाहिजे मग व्यवसाय, अर्थव्यवस्था आणि सुरक्षितेची काळजी घेतली पाहिजे, असा निर्धार राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलतान म्हणाले. सांगली जिल्हा कोरोनामुक्तींच्या मार्गावर जाण्यामागे जिल्हा प्रशासना आणि अधिकाऱ्यांचे यश असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगतिले.

सांगली जिल्हातील २६ जणांपैकी २४ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ही आले आहे. याचा आम्हा सर्वांना आनंद झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच उरलेल्या २ जणांचे रिपोर्टही निगेटिव्ही येईल असा विश्वासही जयंत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. आम्ही सांगली जिल्ह्यात जे लोक परदेशातून आलेत त्यांच्या मनगटावर शिक्के मारून त्यांना घरी थांबविण्याचा खबरदारीचा निर्णय १८ मार्चला घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच जिल्ह्यातील २२ मार्चला सांगलीत एकाट कुटुंबातील लोकाना कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आले यांची माहिती मिळाली. यानंतर आम्ही कुटुंबाच्या संपर्कात २४ आणि १३ लोकांना तातडीने शोधले त्यांना क्वारंटाइन केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग थांबविण्यात आम्हाल यश आल्याचे जयंत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे.

जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य

सांगली शहात जिल्ह्यात शिस्त पाळण्यात आली. मी स्वत: लोकांनी आणि अधिकाऱ्यांची जावून संवाध साधला आणि शिस्त पद्धतीने आम्ही लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. जिल्हा कोरोना मुक्तीच्या मार्गावर असल्याने काही भाग शिथील करणार का?, यासंबद्दत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील काही भागात शिथील करावे लागेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील कामे ही सुरू राहिली पाहिजे. मात्र, शेतात काम करताना देखील गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन देखील जयंत पाटील यांनी एच. डब्ल्यू मराठीशी बोलतान केले.

लॉकडाऊनचे शिस्तबद्ध पद्धतीचे पालन

तसेच सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन शिस्तपणे पाळताना आम्ही जीवनावश्यक वस्तू, औषध, पिण्याचे पाणी, शेतीची औषधे यासर्वांकडे जिल्हा प्रशासन आणि आधिकारी आम्ही लक्ष दिले. यामुळे मुंबई पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या भागा लॉकडाऊन शिस्तीने पाळला जाणार आहे. तर जेथे कोरोना रुग्णा नाही अशा ठिकाणी काही नियम शिथील करून लोकांना सवलती द्यायाचा विचार मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळात करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जयंत पाटीलि यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना दिली आहे. आपण शिथील करण करून पुन्हा आहे त्या परिस्थिती जेणे धोक्याचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. आधी माणसे वाचली पाहिजे मग व्यवसाय, अर्थव्यवस्था आणि सुरक्षितेची काळजी घेतली पाहिजे असे जयंत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलतान म्हणाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी समाजाची जनगणना वेगळी करण्यात व्हावी, छगन भुजबळांची मागणी

swarit

…यावरुन आदित्य ठाकरेंचा पुणेकरांना चिमटा

swarit

राज्यात पहिल्यांदाच पोलीस महासंचालकांना विश्वासात न घेता पोलीस विभागाचा कारभार चाललाय!

News Desk