HW News Marathi
महाराष्ट्र

“त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर…”, जयंत पाटील यांनी व्यक्त केली खंत

मुंबई | आज (१० जून) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खंत व्यक्त केली आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २२ वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाचा प्रवास उलगडताना महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीत आपल्या पक्षाचा सिंहाचा वाटा असल्याचं म्हटलं आहे.

राष्ट्रवादी पक्षाची वाटचाल

“१९९९ साली पक्ष स्थापन झाल्यानंतर लगेचच पक्ष सत्तेत आला होता आणि अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पक्षातील मंत्र्यांवर पडल्या होत्या. सरकाची आर्थिक अवस्था संकटात होती. राज्य आर्थिक सक्षम करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आम्ही राज्य दुरुस्त करण्यात यश मिळवलं. राज्यातील जलसिंचन, ऊर्जा तसंच अशा अनेक अनेक विभागात सुधारणा करण्यात राष्ट्रवादीचं योगदान आहे. महाराष्ट्रात २०१४ च्या आधी १५ वर्षात महाराष्ट्राने जी चौफेर प्रगती केली त्याच आमचा सिंहाचा वाटा होता,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

पक्षाला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची पाटलांना खंत

राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “राजकीय परिस्थितीप्रमाणे तडजोड करणं आवश्यक असतं. २००४ मध्ये राष्ट्रवादीला ७२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली झाली असती असं आजही वाटतं”.

पहाटेच्या शपथविधीचा प्रतिमेवर परिणाम

“ज्यावेळी ही घटना झाली तेव्हा फार मतांतरं होती आणि प्रतिमेवर काहीसा परिणाम झाला. पण त्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या माहे उभे राहिले. अजित पवारही आज एकत्रितपणे काम करत आहेत. मागचं सगळं विसरुन सगळे एकत्र काम करत आहोत. ज्या घटना घडल्या त्यावर मात करुन एकजीवानीशी काम केलं जात आहे,” असं ते म्हणाले आहेत.

चंद्रकांतदादा तुम्ही चुकलातच… जयंत पाटलांनी काढला चिमटा

“चंद्रकांतदादा आमचे कोल्हापूरवाले. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल जिव्हाळा आहे. परंतु त्यांनी कोल्हापूर सोडून पुण्याला जवळ केलं हे आम्हालाही आवडलेलं नाही, पुणेकरांनाही आवडलेलं नाही आणि कोल्हापूरकरांना तर अजिबातच आवडलेलं नाही,” असा चिमटा यावेळी त्यांनी काढला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

Aprna

“आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू”, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला मिश्किल टोला

News Desk

‘रविवारी सत्य उलघडणार! करुणा मुंडे माध्यमांशी साधणार थेट संवाद

News Desk