HW News Marathi
महाराष्ट्र

शिवाजी महाराजांच्या घोषणांवर कुणीही विनाकारण राजकारण करणं योग्य नाही

मुंबई | उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर कोणीही राजकारण करू नये, असे म्हटले होते. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे म्हणणे बरोबर आहे. कुणीही शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करु नये, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “उदयनराजे भोसले यांचं म्हणणं बरोबर आहे. शिवाजी महाराजांच्या घोषणांवर कुणीही विनाकारण राजकारण करणं योग्य नाही.” “सहकारी कारखान्यांना जी मदत लागेल ती राज्य सरकार देत आहे. कारखान्यांना राज्य सरकार हमी देखील देणार आहे. यावर्षी देखील साखर कारखान्यांचं गाळप चांगलं होईल. साधारण महाराष्ट्रात ३५ कारखाने आहेत. यापैकी ज्यांना मदत गरजेची आहे त्यांना राज्य सरकार मदत करेल,” असा विश्वास देखील त्यांनी दिला.

तसेच, जयंत पाटील यांनी यावेळी बकरी ईदबाबत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या विधानावरही आपलेमत व्यक्त केले, “कोणतेही धार्मिक सण साजरे करताना कोरोना संसर्गाच्या संकटाचे भान राखले पाहिजे,” असे जयंत पाटील म्हणाले आहे. त्यामुळे एकीकडे उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला असला तर दुसरीकडे जलील यांना टोला लगावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे धरणे आंदोलन

News Desk

अरविंद सावंत यांच्या नावे बोगस सोशल मीडिया अकाऊंट, पैशांची केली मागणी

News Desk

राज ठाकरेंचा लाडका ‘जेम्स’गेला,ठाकरे झाले भावूक…

News Desk