HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सींग पाळून कोरोनाविरुद्ध सुरू असलेले युद्ध जिंकावे, जयंत पाटलांचे आवाहन

मुंबई | सोशल डिस्टन्सींग पाळा आणि कोरोनाचा संसर्ग टाळा, याची चांगली प्रचिती सांगली जिल्ह्यात अनुभवयास आली असून परदेशवारी केलेले पहिले चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेने सोशल डिस्टन्सींग पाळून कोरोनाविरुद्ध सुरू असलेले युद्ध जिंकावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

राज्यातील रूग्ण संख्या वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, जिल्हा परिषद यासह सर्व यंत्रणां प्रचंड मेहनत घेत आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नागरिकांनी देखील लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत घरीच राहून सहकार्य करावे. अनावश्यक बाहेर पडू नये. विनाकारण रस्त्यांवर येणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करतील, अशी वेळ न येऊ देण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन आवाहन मंत्रीमहोदयांनी केले आहे.

अचूक नियोजन

आपत्ती काळात करावयाच्या विविध उपाय योजनांसाठी अचूक नियोजन आवश्यक असून त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे .सध्याच्या शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा नको, तसेच अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सोबतच शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला नको. याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. याबरोबरच रुग्णसेवेसाठी लागणारी औषधे, यंत्रसामग्री याची सांगली सह राज्यात कमी नाही, जीवनावश्यक वस्तूंची ही उपलब्धता आहे, वितरण ही व्यवस्थित सुरू आहे त्यामुळे ना

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेट्रो कारशेडच्या कामांना स्थगिती देऊन उच्च न्यायालयाने जनभावनेची अवहेलना केली – संजय निरुपम

News Desk

“लाडक्या भावोजींचं आता काही खरं नाही”, मनसे नेत्यांचा सरकारला टोला

News Desk

“महावेध” प्रकल्पाकडे महाराष्ट्र कृषी विभागाचे दुर्लक्ष

Adil