HW News Marathi
महाराष्ट्र

मी राष्ट्रवादीचा नेता मला कॉंग्रेसच्या नाराजीबद्दल काही माहित नाही!

मुंबई | राज्यातील महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये बिघाडी असल्याचं अनेकवेळा दिसून आलं होतं. मात्र, सरकारमधील सर्व नेत्यांनी कायम सरकार टीकरणारच आणइ कोणतेही मतभेद नसल्याचे वारंवार सांगितले होते. दरम्यान, सध्या शिवसेना आणि कॉंग्रेसचा वाद सुरु असल्याचं दिसून येत आहे. UPA अध्यक्ष पदावरुन सध्या शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे. UPA चं अध्यक्षपद सोनिया गांधीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्यात यावे असं राऊत म्हणाले होते. यावर पलटवार करताना नाना पटोले असं म्हणाले होते की, राऊतांनी UPA अध्यक्षपदाची काळजी करु नये. दरम्यान, या मुद्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला असता ते असं म्हणाले आहेत की, मी राष्ट्रवादीचा नेता आहे मला कॉंग्रेसच्या नाराजीबाबत काही माहित नाही.

संजय राऊत कधीकधी पत्रकारासारखं बोलून जातात: आव्हाड

महाविकासआघाडीत काँग्रेस पक्ष नाराज आहे का, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मी राष्ट्रवादीचा नेता आहे, मला काँग्रेसच्या नाराजीबाबत माहिती नाही, असे म्हटले.मात्र, सरकार म्हणजे घर आहे. घरात थोडासा वाद होणारच. लॉकडाऊनसंदर्भात तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. त्याबाबत कुठेही संभ्रम नसेल. संजय राऊत हे नेता आणि पत्रकार अशा दोन भूमिकांमध्ये वावरत असतात. त्यामुळे ते कधीकधी पत्रकारासारखं बोलून जातात, असा चिमटा आव्हाड यांनी काढला आहे.

UPA च्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेल्या लॉबिंगमुळे नाराज असलेले काँग्रेसचे नेते आज (३ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने एच.के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत कॉमन मिनिमम प्रोगामच्या अनुषंगाने चर्चा झाली. याशिवाय, निधी वाटप, राज्यमंत्र्यांचे अधिकार आणि महाविकासआघाडीत नसेलला समन्वय या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या तक्रारी लवकर सोडवाव्यात, असे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे

नाना पटोले-

गेल्या काही दिवसांत काँग्रेसने ठाकरे सरकारला दोनदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांना तर भेटलो पण शरद पवारांशीही बोलणार आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांशीही… राज ठाकरे!

News Desk

पोलिस मेगा भरती करुन जखमेवर मीठ चोळत आहात का? नितेश राणेंचा सरकारला सवाल

News Desk

अन्यथा आंदोलन तीव्र करु…मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सरकारला इशारा!

News Desk