HW News Marathi
महाराष्ट्र

‘अमृता फडणवीस कोण आहेत ?’, किशोरी पेडणेकरांचा टोला

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही महाविकासआघाडीवर नेम धरला आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या शहरात सरकारनं निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारनं पुण्यातील निर्बंध जैसे थेच ठेवले आहेत. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांना आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर केलं आहे.

कोण अमृता फडणवीस?

किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस कोण असा टोला त्यांनी लगावला आहे. कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय. तसंच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं सांगत त्यांनी हा विषय टाळलाय. दुसरीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगलं काम करत आहे. पण त्यांना दिलेलं काम योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, अशंही पेडणेकर म्हणाल्या. लोकल सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे. पत्रकार हा कोरोना संकटाच्या काळात पुढे राहून काम करत होते. त्यामुळे त्यांना रेल्वे प्रवास मिळायला हवा, असं मतही पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

‘महाविकासआघाडीत एकमेकांची चांगली पाठ खाजवतात’

महाविकास आघाडीवर विरोधी पक्ष सातत्याने टीका करत असतात.तर अशी कुठली एखादी गोष्ट आहे का महाविकास आघाडी सरकारची जी तुम्हाला आवडते ? या प्रश्नावर उत्तर देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या की,महाविकासआघाडीतले हे लोक खूप चांगल्या प्रकारे एकमेकांची पाठ खाजवतात.एकमेकांपुढे उभे राहतात, एकमेकांना वाचवतात ही चांगली गोष्ट आहे.असं अमृता फडणवीस पुण्यात एच डब्लू न्यूज मराठीशी बोलतांना म्हणाल्या.

हातमागाविषयी अमृता फडणवीस काय म्हणाल्या ?

“हॅन्डलूम जगभरात आहे. हॅन्डलूम 125 देशात एक्स्पोर्ट होतं. शेती नंतर हातमाग हा सर्वात मोठा उद्योग आहे. 77 टक्के या कामात स्त्रिया आहेत. 7 ऑगस्ट 2015 पासून हातमागदिन साजरा केला जातो.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखले आहे. स्वदेशी चळवळ 7 ऑगस्टला सुरु झाली होती. त्याचमुळे 7 ऑगस्ट ला हातमागदिन साजरा केला जातो. पैठणीचं कारोबारही मोठा आहे. देशातले स्त्रिया पैठणी ऐटीने घालतात. हॅन्डलूमचं क्षेत्रही चांगलं वाढत आहे. हँडलूमच्या वस्तू फक्त जपून ठेवायच्या नाहीत त्या वापरायच्या.”, अस अमृता फडणवीस उद्घाटन कार्यक्रमानंतर म्हणाल्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारची पहिली विकेट, संजय राठोड यांनी दिला राजीनामा

News Desk

कंगना प्रकरण हे शिवसेनेचंच षडयंत्र, मनसेचा  सेनेवर गंभीर आरोप

News Desk

शिवस्वराज्य यात्रा संपली कि राष्ट्रवादी देखील संपेल !

News Desk