HW News Marathi
Covid-19

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच | उपमुख्यमंत्री अजित पवार 

पुणे | कोरोनाकाळात अत्यंत संयंतपणे वार्तांकन करणारे ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे पुण्यात कोरोनाने निधन झाले. रायकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय वर्तुळातूनही मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. यावर, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला”, असे म्हणत अजित पवार यांनी आयुक्तांकडे अहवाल मागितला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री काय म्हणाले ?

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “पांडुरंग आपल्यातून जाणं ही निश्चितच आपल्यासाठी धक्कादायक बाब आहे. ही दुर्देवी घटना आहे. त्यांचे गेले ५ महिने ते पुण्यातील कोरोना स्थितीवर बारीक लक्ष होते. त्यांनी खूप काम केले आहे. रायकर यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीकरिता पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना सूचनाही दिल्याची माहिती यावेळी राजेश टोपेंनी दिली आहे. “पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी केली जात आहे. कोव्हिड काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत दिली जाईल. ते जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. त्यांना विम्याची मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करु”, असे आश्वासन देखील राजेश टोपे यांनी दिले आहे.

पुण्याचे महापौर काय म्हणतात ?

“पांडुरंगच्या सर्व विषयात आम्ही सर्वजण पत्रकारांच्या संपर्कात होतो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना बेड उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. रात्री बेड उपलब्ध झाला. मात्र, कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. व्यवस्थेतील या त्रुटींमुळे पांडुरंग रायकर यांना जीव गमवावा लागला हे मी मान्य करतो”, असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. “मात्र यात ‘ही महापालिकेची जबाबदारी आहे की राज्य सरकारची ?’ असे म्हणून कोणीही जबाबदारी झटकून चालणार नाही”, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

“एका पत्रकराचे अशाप्रकारे निधन होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि मनाला धक्का लावून जाणारी बाब आहे. पांडुरंग या चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा असा मृत्यू होणे हे दुर्दैवी आणि अंतर्मुख करायला लावणारा आहे. पत्रकारांची परिस्थिती अशी असेल तर मग ती योग्य नाही. मी याविषयी प्रशासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन”, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. पूर्व विदर्भात पूर परिस्थितीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना मदत द्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

मुंबईतील ‘या’ रेस्टोरंटमध्ये १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk