HW News Marathi
महाराष्ट्र

ध्येय मोठे ठेवल्यास यशापर्यंत पोहोचता येते !

सांगली | जीवनात अपयश आले म्हणून आपण खचून जाऊ नये प्रामाणिक प्रयत्न करावा. ध्येय मोठे ठेवल्यास ध्येयापर्यंत पोहचता येते असे मत आय. ए.एस. अधिकारी गणेश टेंगले यांनी व्यक्त केले आहे. बाबरवस्ती पांडोझरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आय.ए.एस. पदी निवड झाल्याबद्दल सत्कार सभारंभ कार्यक्रमात बोलत होते . स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने हा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, जिद्दीने अभ्यास केला एक ध्येय ठेवून तीन वर्षे मेहनत केली. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले.आज कितीही वेगवेगळ्या शाळा निघाल्या तरी मोफत व गुणवत्ता पूर्ण शिक्षण जर गोरगरिबाच्या मुलांना मिळायचे असेल तर सरकारी शाळा हा एकमेव पर्याय आहे.

जत सारख्या दुष्काळी भागातून आल्याने आजूबाजूची परिस्थिती माहीती होती. त्याचा फायदा झाला.घरची परिस्थिती बरी होती वडील ऊस तोडणी मुकादम आहे. आई,भाऊ, कुंटुबाचे प्रोत्साहन मिळाले असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता मोटे, केरुबा गडदे,नेताजी टेंगले,रियाज जमादार, मुख्याध्यापक दिलीप वाघमारे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा खो खो सुरू केला” – संजय राऊत

News Desk

मराठा आरक्षण रद्द, पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

News Desk

अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे,कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा

swarit
महाराष्ट्र

टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना राज्य सरकार प्रोत्साहन देणारः सुभाष देसाई

swarit

मुंबईः टाकावूपासून टिकावू वस्तू तयार करण्याची भारताची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. भविष्यात अशा प्रकारचे काम करणाऱ्या कंपन्या राज्यात सक्रिय झाल्यास त्यास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे राज्य सरकारचे धोरण राहील, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फ्रान्स येथील शिष्टमंडळास दिले.

मोठ्या शहरात दिवसेंदिवस स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत आहे. याचसोबत कालबाह्य झालेल्या वाहनांची समस्यादेखील सर्वांना भेडसावत आहे. कालबाह्य वाहने नष्ट करून किंवा त्या वाहनांचा पुन्हा वापर करण्यासाठी फ्रान्सची इंदिरा कंपनी कार्यरत आहे. भारतात ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. पर्यावरण संवर्धानासोबत भंगार वाहने नष्ट करण्याचे काम ही कंपनी करत आहे. जगभरात अनेक देशात कंपनी काम करते. भारतात देखील ही कंपनी आपला विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी सांगितले.

यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बे रोझेट, तांत्रिक विभाग प्रमुख आँलिवर ग्वाझु, महिंद्रा सनयो स्पेशल स्टिल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उदय गुप्ता, कार्यकारी अधिकारी दिलीप पाचपांडे, सल्लागार सतीश घोरगे, नाथ इक्जिमचे संचालक विरंजन नाथ आदी उपस्थित होते. दरम्यान, पुनर्वापर आणि प्रक्रिया हे भविष्याची गरज असून उद्योग मंत्रालय अशा कंपन्यांना कायम पाठिंबा देईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अशा प्रकारच्या कंपन्या सुरू करण्यासाठी राज्य सरकार विशेष धोरण तयार करेल, असे आश्वासन देसाई यांनी दिले.

Related posts

एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला, शेलारांचा ठाकरे सरकारला टोला

News Desk

महाराष्ट्रावर तौक्ते चक्रीवादळाचं संकट, मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली चर्चा

News Desk

“तुम्हा सगळ्यांना मीच पुरुन उरेल…”, चित्रा वाघ भडकल्या

News Desk