HW News Marathi
महाराष्ट्र

‘महाराष्ट्राचे मंत्री ११ दिवस गायब’ जनता वाऱ्यावर आहेचं पण मंत्र्यांना तरी शोधा!

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने ठाकरे सरकार अडचणीत सापडलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप ताजे असतानाच संजय राठोड प्रकरणामुळे विरोधकांना महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची आयती संधीच मिळाली आहे. भाजपने हे प्रकरण चांगलेच उचलून धरले आहे.

प्रकरणात भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी ट्विट करून सरकारवर निशाणा साधला आहे. उपाध्ये म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वसामान्य सुरक्षित नाहीत हे तर दिसतच होत पण आता मंत्री महोदय १० दिवस गायब असतात कुणालाच सापडत नाही यापेक्षा राज्याची वाईट अवस्था काय असू शकते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तसेच रोज तुमच्या सोबत बसणारा सहकारी मंत्री ११ दिवस गायब आहे त्याला तरी शोधा, महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ना आता ना पता. जनतेला वाऱ्यावर सोडल हे दिसतय पण किमान सहकारी मंत्री त्याचा तरी शोध घ्या असा टोला केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षाने सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलचा शेवटचा पेपर रद्द

News Desk

ग्रामपंचायत विधेयकावरून हसन मुश्रीफ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद, अखेर विधेयक मंजूर

News Desk