HW News Marathi
महाराष्ट्र

INS विक्रांत प्रकरण ताजं असतानाच किरीट सोमय्यांची ED च्या कार्यालयात धाव; पण कारण काय?

मुंबई | मागील अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडीतील नेते व मंत्री एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना पाहायला मिळतात. एकीकडे किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तर दुसरीकडे सोमय्यांच्या आरोपांनंतर संबंधित नेत्यांवर कारवाई सुद्धा होत आहे. तर आतापर्यंत सोमय्यांनी आरोप केलेले काही नेते तुरुंगात देखील गेले आहेत. मात्र, आता किरीट सोमय्या हे स्वतः अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. असं असतानाही आज (गुरुवार, ७ एप्रिल) ते पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यामुळे यावेळी सोमय्या नेमकं कोणत्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी ईडीकडे गेलेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. 

नुकतंच किरीट सोमय्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही जमीन खरेदी प्रकरणात आरोप केले असून राऊतांच्या अलिबागमधील जमीन व मुंबईतील दादर येथील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. मात्र, राऊतांवर झालेल्या कारवाईनंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांचा चांगलाच समाचार घेतला. इतकंच नव्हे तर यावेळी सुद्धा संजय राऊतांनी सोमय्यांनी घोटाळा केला असल्याचा दावा केला आहे. आयएनएस विक्रांत जहाज प्रकरणी राऊतांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळे सोमय्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

काय आहे प्रकरण?

२०१३-१४ किंवा २०१४-१५ मध्ये किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी सामान्य जनतेकडून वर्गणी गोळा केली होती. साधारण ५८ कोटी रुपये जमा केल्याचा दावा राऊतांनी केला असून ही रक्कम सोमय्यांनी लाटली असंही त्यांनी आपल्या आरोपांमध्ये म्हंटलेलं आहे. जनतेकडून गोळा केलेले पैसे सोमय्यांनी राज्यपालांकडे जमा केले नाहीत व हे पैसे त्यांनी आपल्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरले, असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोमय्यांनी देशद्रोह केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत करत आहेत.

अशातच आज सोमय्या हे सकाळीच ईडीच्या कार्यालयात काही शेतकऱ्यांसोबत दाखल झाले होते. जरंडेश्वर साखर कारखान्यातील सभासद शेतकरी यावेळी त्यांच्यासोबत होते. खरंतर याधीच सोमय्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यात घोटाळा झाला असल्याचा दावा करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केला होता. तसेच आजही सोमय्यांनी यावरून अजित पवारांवर निशाणा साधला. जर अजित पवार म्हणत असतील की त्यांचा या कारखान्याशी संबंध नाहीये तर मग त्यांनी तो कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा आणि आदर्श उदाहरण ठेवावं, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच आज त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन ईडी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असल्याची माहिती देखील दिली. 

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी सोमय्यांना संजय राऊतांनी आरोप केलेल्या आयएनएस विक्रांत प्रकरणासंबंधित प्रश्न उपस्थित केले. मात्र, यावर बोलताना सोमय्या गडबडले. आयएनएस विक्रांत प्रकरणात किती पैसे गोळा करण्यात आले होते? तसेच ते पैसे कुठे गेले?, असा सवाल पत्रकारांनी त्यांना विचारला होता. मात्र यावर बोलणं त्यांनी टाळलं. पण पत्रकारांनीही पुन्हा तोच प्रश्न पुन्हा एकदा विचारला, तरी देखील मूळ प्रश्न बाजूला सारत सोमय्यांनी भलतंच उत्तर दिलं. तर यावेळी ते काहीसे संतापले असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात आल्यावर सोमय्यांचा पारा चढला आणि मी पैसा किती जमा केला तसेच तो कुठे गेला याचं उत्तर संजय राऊत यांनीच दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पिंपरीमधील झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट, दोन जणांचा मृत्यू

News Desk

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांच्यासाठी अनुदान

Aprna

सध्या विरोधक हे गलितगात्र झाल्याचे चित्र आहे !

News Desk