HW News Marathi
महाराष्ट्र

कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीत भाजपच्या अतुल भोसलेंचा विजय!

सातारा | गेल्या काही दिवसांपासून चर्चा सूरु असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अखेर महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई, भाजप नेते डॉ. अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांना या निवडणुकीत चांगलंच चितपट केलं आहे.

भाजपाच्या डॉ. अतुल भोसलेंकडून कारखान्याची सत्ता हस्तग करण्यात यश मिळवले आहे. या दोन्ही काँग्रेस नेत्यांचे मनसुबे कृष्णेच्या सभासदांनी उधळले असून सहकार संस्थेत राजकारण आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न, निवडणुकीत शेतकरी, शेती, कारखान्यासंबंधी विरोधकांकडे प्रभावी मुद्दा नसल्याने विरोधकांचा दारुण पराभव झाला आहे, अशा प्रतिक्रिया सभासद व्यक्त करत आहेत.

बहु प्रतिक्षित कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा मतमोजणीचा निकाल जाहीर झाला असून डॉ अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलनी सर्व २१ जागावर दहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. दुपारपासूनच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष सुरु केला होता. रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती.

अखेर अतुल भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांचा पराभव केला आहे. सातारा सांगली जिल्ह्यात ४७१४५ सभासद असणाऱ्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने दणदणीत विजयी मिळवला आहे.

आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त मताधिक्य

या निवडणुकीत मिळालेलं मताधिक्य आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. या कारखान्याची सत्ता भोसले गटाकडून दुसरीकडं जावी म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व विरोधक एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. ही निवडणूक तिरंगी झाली होती. माजी चेअरमन अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल आणि राज्यमंत्री विश्वजित कदम नेतृत्व करत असलेले रयत पॅनेल अशी आणखी दोन पॅनल रिंगणात आल्याने या निवडणुकीची चर्चा खूप झाली. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते.

विजयानंतर अतुल भोसलेंची प्रतिक्रिया

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त कृष्णा सहकारी साखर कारखाना राजकारणाचा अड्डा बनवण्याचे षडयंत्र अनेक राजकारण्यांचं होतं मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर डॉ अतुल भोसले यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता 

News Desk

बीड जिल्हा कचेरीच्या आवारातील रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार

News Desk

हे फक्त पिता-पुत्र आणि पुतण्याभोवती फिरणारं सरकार! – आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा  

News Desk